शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीएसई’ बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:31 IST

अकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील राजनंदिनी घुगे, सिद्धी मुंदडा आणि अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी सारंगा पटोकार, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या श्रुती जैन, माधवी ढेपे, साक्षी घोडकी यांनी बाजी मारली आहे. मुलांमध्ये यज्ञेश मुंदडा, प्रथमेश कुलकर्णी व सागर जाधव गुणवत्ता यादीत चमकला आहे.अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलमध्ये सीबीएसई उच्च माध्यमिक इयत्ता बारावीची पहिलीच बॅच असून, प्रभातच्या एकूण २३ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड प्राप्त केला आहे तर फिजिकल एज्युकेशन या विषयात सर्वच विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. सारंगा हिने ९५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. जीवशास्त्र विषयामध्ये तिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. शाळेचा एकूण निकाल ९५ टक्के लागला आहे. स्कूल आॅफ स्कॉलर्समधील श्रुती जैन हिने ९४.६ टक्के, यज्ञेश मुंदडा याने ९२.८0, माधवी ढेपे हिने ९१.६0, प्रथमेश कुलकर्णी याने ९१.४0, साक्षी घोडकी हिने ८९.४0 टक्के गुण प्राप्त केले. वाशिम जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूल या दोन्ही शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. जवाहर नवोदय विद्यालय येथील एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. जवाहर नवोदय विद्यालयाची राजनंदिनी घुगे हिला ९५.0६ टक्के गुण मिळाले. सिद्धी मुंदडा हिला ९३.0३ टक्के मिळाले. सिद्धीने गणित विषयात १00 पैकी १00 गुण प्राप्त केले. सागर जाधव याला ९१ टक्के गुण मिळाले. एकंदरीत सीबीएसई निकालावरून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी