शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 09:57 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.

- प्रवीण खेतेअकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून आल्या आहेत; मात्र अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या सोयाबीनची यंदा अनेक भागात लागवड करण्यात आली; परंतु अनेक भागात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येऊ लागल्या. अशातच १९ जून रोजी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून एका पत्राद्वारे बियाणे उत्पादन कंपन्यांना दिलासा देण्यात आला. त्यानुसार, यंदाच्या खरीप हंगामाची उगवण क्षमता ही ६५ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर आणण्यात आली. बियाण्यांच्या उगवण क्षमतेचे प्रमाण कमी करण्याची गत तीन महिन्यातील ही दुसरी वेळ होती. यापूर्वी १५ एप्रिल रोजी केंद्र सरकारने उगवण क्षमता ६५ टक्क्यांवर आणली होती. ती यापूर्वी ७० टक्क्यांवर होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीसाठी एकरी सरासरी ३० ऐवजी ३५ किलो बियाण्यांची बॅग खरेदी करावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाने झाले नुकसानगतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. परिणामी बीज उत्पादनासाठी साठवून ठेवलेले बियाणे पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरदेखील झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.केद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर आणली आहे. गतवर्षी बियाणे पावसात भिजल्याने बीज उत्पादनावर परिणाम झाला.- प्रफुल्ल लहाने, गुणवत्ता नियंत्रक, महाबीज, अकोला

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र