शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 09:57 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.

- प्रवीण खेतेअकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून आल्या आहेत; मात्र अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या सोयाबीनची यंदा अनेक भागात लागवड करण्यात आली; परंतु अनेक भागात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येऊ लागल्या. अशातच १९ जून रोजी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून एका पत्राद्वारे बियाणे उत्पादन कंपन्यांना दिलासा देण्यात आला. त्यानुसार, यंदाच्या खरीप हंगामाची उगवण क्षमता ही ६५ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर आणण्यात आली. बियाण्यांच्या उगवण क्षमतेचे प्रमाण कमी करण्याची गत तीन महिन्यातील ही दुसरी वेळ होती. यापूर्वी १५ एप्रिल रोजी केंद्र सरकारने उगवण क्षमता ६५ टक्क्यांवर आणली होती. ती यापूर्वी ७० टक्क्यांवर होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीसाठी एकरी सरासरी ३० ऐवजी ३५ किलो बियाण्यांची बॅग खरेदी करावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाने झाले नुकसानगतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. परिणामी बीज उत्पादनासाठी साठवून ठेवलेले बियाणे पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरदेखील झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.केद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर आणली आहे. गतवर्षी बियाणे पावसात भिजल्याने बीज उत्पादनावर परिणाम झाला.- प्रफुल्ल लहाने, गुणवत्ता नियंत्रक, महाबीज, अकोला

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र