शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 09:57 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.

- प्रवीण खेतेअकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून आल्या आहेत; मात्र अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या सोयाबीनची यंदा अनेक भागात लागवड करण्यात आली; परंतु अनेक भागात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येऊ लागल्या. अशातच १९ जून रोजी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून एका पत्राद्वारे बियाणे उत्पादन कंपन्यांना दिलासा देण्यात आला. त्यानुसार, यंदाच्या खरीप हंगामाची उगवण क्षमता ही ६५ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर आणण्यात आली. बियाण्यांच्या उगवण क्षमतेचे प्रमाण कमी करण्याची गत तीन महिन्यातील ही दुसरी वेळ होती. यापूर्वी १५ एप्रिल रोजी केंद्र सरकारने उगवण क्षमता ६५ टक्क्यांवर आणली होती. ती यापूर्वी ७० टक्क्यांवर होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीसाठी एकरी सरासरी ३० ऐवजी ३५ किलो बियाण्यांची बॅग खरेदी करावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाने झाले नुकसानगतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. परिणामी बीज उत्पादनासाठी साठवून ठेवलेले बियाणे पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरदेखील झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.केद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर आणली आहे. गतवर्षी बियाणे पावसात भिजल्याने बीज उत्पादनावर परिणाम झाला.- प्रफुल्ल लहाने, गुणवत्ता नियंत्रक, महाबीज, अकोला

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र