शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कचऱ्याचे ढिगारे;  मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:56 IST

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मनपाची स्वच्छता व आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी कंत्राटदारांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियानचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना अकोला शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’अभियान राबवण्यास सुरुवात केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून केंद्रासह राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने विलगीकरण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. अशा कचºयाचे विलगीकरण केल्यावरच त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय डम्पिंग ग्राउंडवर टाकलेल्या कचºयावरही प्रक्रिया करण्यासाठी स्वायत्त संस्थांनी ठोस निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. प्राप्त निधीतून कचºयाची समस्या निकाली काढण्याची गरज असताना सत्ताधारी भाजपासह प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यासह देशभरात ‘स्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.अकोलेकरांना जबाबदारीचा विसरशहराच्या कोण्याही भागात फेरफटका मारल्यास सर्व्हिस लाइन घाणीने गच्च भरल्याचे दिसून येते. गल्लीबोळात कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकही त्यांच्या घरातील केरकचरा घंटागाडीत कितपत टाकतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरातील कचरा घंटागाडीत टाकल्यास उघड्यावर कचरा साचणार नाही, याची जाण अकोलेकरांनी ठेवण्याची गरज आहे.

 आरोग्य निरीक्षक सुस्त, अकोलेकर त्रस्त!शहरात दैनंदिन होणाºया साफसफाईच्या कामावर देखरेख ठेवून त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अखत्यारित सेवा बजावणाºया आरोग्य निरीक्षकांवर आहे. त्यांच्यावर मानधन तत्त्वावर कार्यरत सहाय्यक आरोग्य निरीक्षक अब्दुल मतीन यांचे नियंत्रण आहे. शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठेत साचलेली घाण सर्वसामान्य अकोलेकरांना दिसत असताना मनपाचे आरोग्य निरीक्षक दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या भागात घाण व कचरा साचला असेल, त्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकांच्या वेतनातून दंड वसूल करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका