शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहरात कचऱ्याचे ढिगारे;  मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:56 IST

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मनपाची स्वच्छता व आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी कंत्राटदारांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियानचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना अकोला शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’अभियान राबवण्यास सुरुवात केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून केंद्रासह राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने विलगीकरण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. अशा कचºयाचे विलगीकरण केल्यावरच त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय डम्पिंग ग्राउंडवर टाकलेल्या कचºयावरही प्रक्रिया करण्यासाठी स्वायत्त संस्थांनी ठोस निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. प्राप्त निधीतून कचºयाची समस्या निकाली काढण्याची गरज असताना सत्ताधारी भाजपासह प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यासह देशभरात ‘स्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.अकोलेकरांना जबाबदारीचा विसरशहराच्या कोण्याही भागात फेरफटका मारल्यास सर्व्हिस लाइन घाणीने गच्च भरल्याचे दिसून येते. गल्लीबोळात कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकही त्यांच्या घरातील केरकचरा घंटागाडीत कितपत टाकतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरातील कचरा घंटागाडीत टाकल्यास उघड्यावर कचरा साचणार नाही, याची जाण अकोलेकरांनी ठेवण्याची गरज आहे.

 आरोग्य निरीक्षक सुस्त, अकोलेकर त्रस्त!शहरात दैनंदिन होणाºया साफसफाईच्या कामावर देखरेख ठेवून त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अखत्यारित सेवा बजावणाºया आरोग्य निरीक्षकांवर आहे. त्यांच्यावर मानधन तत्त्वावर कार्यरत सहाय्यक आरोग्य निरीक्षक अब्दुल मतीन यांचे नियंत्रण आहे. शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठेत साचलेली घाण सर्वसामान्य अकोलेकरांना दिसत असताना मनपाचे आरोग्य निरीक्षक दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या भागात घाण व कचरा साचला असेल, त्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकांच्या वेतनातून दंड वसूल करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका