शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST

कोरोना काळात बहुतांश लोक घरातच होते. त्यामुळे समाजासोबतचा संवाद तुटला. मुलांची शाळा ऑनलाइन झाली, तर नोकरदारांचेही वर्क फ्रॉम होम ...

कोरोना काळात बहुतांश लोक घरातच होते. त्यामुळे समाजासोबतचा संवाद तुटला. मुलांची शाळा ऑनलाइन झाली, तर नोकरदारांचेही वर्क फ्रॉम होम सुरू झाले. त्यामुळे गृहिणींच्या कामाचे गणितही चुकू लागल्याने चिडचिड वाढू लागली. त्यामुळे अनेक कुटुंबात गृहकलह देखील वाढल्याचे दिसून आले. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाल्याने अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागला, मात्र हे सर्व असताना तुम्ही जर जवळच्या व्यक्तीजवळ मन हलके केले, त्याच्याशी बोलून तणावाचा निचरा केल्यास मानसिक आरोग्य टिकून राहू शकते.

मन हलके करणे हाच उपाय

मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. कुठल्याही गोष्टीचा किंवा घटनेचा अति विचार करणे, भीती बाळगणे, शांत बसावेसे वाटणे ही लक्षणे मानसिक आजाराची आहेत.

आपल्यातही अशी लक्षणे दिसत असतील, तर कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रांसोबत गप्पा मारा. ज्या गोष्टीमुळे ताणतणाव वाढत आहे, त्या गोष्टी मित्राकडे बोलून मन हलके करा.

मानसिक ताण कमी करण्याचा हा चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी संवाद साधा, आवडीच्या गोष्टी करा आणि कामाचे नियोजन करा.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात.....

बदलती जीवनशैली आणि वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे अनेकांमधील संवाद कमी झाला आहे. दुसरीकडे वाढता ताणतणाव यामुळे मानसिक आरोग्यही ढासळत आहे. यापासून बचावासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे.

- डॉ. शिल्पा तेलगोटे, मानसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला