शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST

कोरोना काळात बहुतांश लोक घरातच होते. त्यामुळे समाजासोबतचा संवाद तुटला. मुलांची शाळा ऑनलाइन झाली, तर नोकरदारांचेही वर्क फ्रॉम होम ...

कोरोना काळात बहुतांश लोक घरातच होते. त्यामुळे समाजासोबतचा संवाद तुटला. मुलांची शाळा ऑनलाइन झाली, तर नोकरदारांचेही वर्क फ्रॉम होम सुरू झाले. त्यामुळे गृहिणींच्या कामाचे गणितही चुकू लागल्याने चिडचिड वाढू लागली. त्यामुळे अनेक कुटुंबात गृहकलह देखील वाढल्याचे दिसून आले. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाल्याने अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागला, मात्र हे सर्व असताना तुम्ही जर जवळच्या व्यक्तीजवळ मन हलके केले, त्याच्याशी बोलून तणावाचा निचरा केल्यास मानसिक आरोग्य टिकून राहू शकते.

मन हलके करणे हाच उपाय

मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. कुठल्याही गोष्टीचा किंवा घटनेचा अति विचार करणे, भीती बाळगणे, शांत बसावेसे वाटणे ही लक्षणे मानसिक आजाराची आहेत.

आपल्यातही अशी लक्षणे दिसत असतील, तर कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रांसोबत गप्पा मारा. ज्या गोष्टीमुळे ताणतणाव वाढत आहे, त्या गोष्टी मित्राकडे बोलून मन हलके करा.

मानसिक ताण कमी करण्याचा हा चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी संवाद साधा, आवडीच्या गोष्टी करा आणि कामाचे नियोजन करा.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात.....

बदलती जीवनशैली आणि वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे अनेकांमधील संवाद कमी झाला आहे. दुसरीकडे वाढता ताणतणाव यामुळे मानसिक आरोग्यही ढासळत आहे. यापासून बचावासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे.

- डॉ. शिल्पा तेलगोटे, मानसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला