शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेत झाले होते गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन; वाघोली बनले गांधीग्राम!

By atul.jaiswal | Updated: October 2, 2019 11:58 IST

महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले.

ठळक मुद्दे१२ फेब्रुवारी १९४८ रोजी गांधीजींच्या अस्थी पूर्णा नदीत प्रवाहित करण्यात आल्या.७ फूट उंचीचा संगमरवरी दगडातून साकारलेला महात्मा गांधींचा कोरीव पुतळा स्थानापन्न करण्यात आला. दिमाखदारपणे उभे असलेले हे स्मारक अकोट-अकोला मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

- अतुल जयस्वालअकोला : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा किंवा त्यांच्या नावाने एखादे नगर नाही, असे एकही शहर भारतात सापडणार नाही; परंतु एखाद्या गावालाच गांधीजींचे नाव असणारे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे बहुधा एकमेव गाव असावे. महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले. गांधीजींचे स्मारक म्हणून या गावात त्यांचा संगमरवरी दगडाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला असून, असा पुतळाही विरळाच आहे. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दिमाखदारपणे उभे असलेले हे स्मारक अकोट-अकोला मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या अस्थी देशात विविध ठिकाणच्या पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी यांनी गांधीजींच्या अस्थी अकोल्यापासून १८ किलोमिटर अंतरावर असलेल्या वाघोली गावातून वाहणाºया पूर्णा नदीत विसर्जित करण्यासाठी आणल्या होत्या. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी गांधीजींच्या अस्थी पूर्णा नदीत प्रवाहित करण्यात आल्या. त्यावेळी या ठिकाणी मोठा समुदाय जमला होता, असे जुने ग्रामस्थ सांगतात. ब्रजलाल बियाणी यांनी त्यावेळी गावकºयांसोबत चर्चा करून गांधीजींचे मोठे स्मारक बांधण्याचे ठरविले. स्मारक बांधण्याचे निश्चित झाल्यानंतर सेठ खुशालसिंग मोहता यांनी गावातील ८ एकर जमीन उपलब्ध करून दिली, तर गोपालदास मोहता यांनी ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली, तसेच तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताकडून १ लाख १० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. शंभर चौरस फूट चौथºयावर भव्य घुमटाकार मंदिर उभारून त्यामध्ये ७ फूट उंचीचा संगमरवरी दगडातून साकारलेला महात्मा गांधींचा कोरीव पुतळा स्थानापन्न करण्यात आला. २ आॅक्टोबर १९४८ रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. गांधीजींचे मोठे स्मारक झाल्यापासून वाघोली हे गाव गांधीग्राम म्हणून ओळखले जाऊ लागले.गांधीजींचा संगमरवरी दगडाचा देशातील दुसरा पुतळामहात्मा गांधी यांचे पुतळे प्रत्येक शहरात पहावयास मिळतात; परंतु पूर्णाकृती संगमरवरी दगडात साकारण्यात आलेला गांधीजींचा पुतळा गुजरात राज्यातील दांडीनंतर अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथेच असल्याचा दावा करण्यात येतो.महात्मा गांधी विद्यालय आले नावारूपासस्मारक उभारल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला निवासी व रात्र शाळा सुरू करण्यात आली. त्यावेळी रोवलेल्या या शाळारुपी बिजाचे रूपांतर कालांतराने महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विशाल वटवृक्षात झाले. बारावीपर्यंत अभ्यासक्रम असलेल्या या कनिष्ठ महाविद्यालयात परिसरातील गावांमधील शेकडो विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. महात्मा गांधींची जयंती व पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी