शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गांधीजींनी वाडेगावला म्हटले होते...ही तर विदर्भाची बार्डोर्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:23 IST

राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनीचं वाडेगाव ला विदर्भाची बार्डोली असे गौरवाने संबोधिले

-संजय खांडेकर अकोला : तसे पाहिले तर वाडेगाव हे बाळापूर तालुक्यातील लहानसे गाव. मात्र मुगलकाळानंतर बाळापूरला देखिल लहानशा वाडेगावने मागे टाकले. स्वातंत्र्यचळवळीत सर्वांत जास्त लढवय्ये वाडेगाव, पारस दिले. त्यामुळेचं दस्तुरखुद्द राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनीचं वाडेगाव ला विदर्भाची बार्डोली असे गौरवाने संबोधिले. महात्त्मा गांधीचा १५० वा शताब्दी महोत्सव देशभरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वाडेगावच्या गाजलेल्या सभेचा घेतलेला आढावा.मुंबईत झालेल्या भाषणातून महात्मा गांधी यांनी खरा भारत खेड्यात आहे, खेडूत जनतेची सेवा करा असा संदेश दिला. या भाषणाने प्रेरीत होऊन मुंबईतील गुजराती गृहस्थ धनजीभाई ठक्कर भारावले. मुंबईतील शहरी जीवन सोडून अकोला जिल्हा परिसरात देशभक्तीच्या प्रचार-प्रसार कार्यात लागले. त्यांना अकोल्यातील मशरूवाला परिवाराची साथ होतीच. अकोला जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी चळवळ उभारली. त्यामुळे हजारो लोक स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊ लागले. अकोल्यापेक्षाही मोठा प्रतिसाद बाळापूरच्या वाडेगाव आणि पारस परिसरात मिळत असल्याने धनजीभाई वाडेगाव येथेचं स्थायीक झाले. वाडेगावातूनच मग मोहिम चालवायचे. कै.वीर वामनराव मानकर, कै.अवदूतराव मानकर ,कै.सदाशिव चिंचोळकर, युसूब बेग काझी,कै. महादेव नटकूट, शंकर मानकर यांनी खांद्याला खांदा लावून धनजीभाईंना मोलाची साथ दिली. वाडेगाव येथील मानकर परिवाराचा यामध्ये मोठा पुढाकार होता. जिल्ह्याचे प्रमुख क्रांतीकारक ब्रिजलाल बियाणी सतत वाडेगावला येवून सभा घेत असत.१९२१ च्या असहकार आंदोलनात येथील स्वातंत्र्य सैनिकांचा प्रमुख सहभाग होता. १९२७ मध्ये अकोला येथील रामगोपाल अग्रवाल यांच्या वाडेगाव येथील जागेत धनजीभाईंनी कार्यालय उघडले. १९३२ च्या मिठाच्या सत्याग्रहात वाडेगाव, पारस, आलेगाव येथील लढवय्ये सहभागी झाले. वाडेगावची कीर्ती अकोल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशात गाजू लागली. महात्त्मा गांधीपर्यंत ही बातमी पोहोचली. वाडेगावची दखल घेत महात्त्मा गांधी १८ नोव्हेंबर १९३३ त्यांनी येथे सभा घेण्याचा निर्णय घेतला.हरीजन सेवक संघाच्या कार्याकरीता महात्मा गांधी १७ नोव्हेंबर रोजी अकोला परिसरात दौऱ्यावर आले.अमरावतीहून कारंजा मार्गे मूर्तिजापूर , येथून रेल्वेमार्गे शेगाव, तेथून खामगाव येथे गेले. येथे मुक्काम करून १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हा दौरा सुरू झाला. सकाळी आठ वाजता ते वाडेगाव येथे पोहोचले. गांधीजींचे भव्य स्वागत येथे झाले.बैलगाड्या भरभरून त्यांच्या सभेला माणसांची गर्दी झाली. त्याकाळी एक लाख लोकांनी सभेला गर्दी केली होती. वाडेगावच्या निगुर्णा नदीच्या पात्रात ही भव्य जाहीर सभा झाली. त्याच वेळी त्यांनी वाडेगावला बार्डोली आॅफ बेरार असे संबोधून वाडेगाववासियांचा सन्मान केला. स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे भाषण महात्मा  गांधींचे येथे झाले होते. याच दरम्यान राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी अकोल्यातील राष्ट्रीय शाळेला भेट दिली. राष्ट्रीय शाळेत दोनदा महात्मा गांधीनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. पहिल्यांदा जेव्हा गांधीची येथे आले होते. तेंव्हा त्यांनी साबरमतीच्या आश्रमातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या गणपत बोराळे या शिक्षकाची आत्मीयतेने चौकशी केली होती. महात्मा गांधीच्या सुष्ना निर्मला रामदास गांधी (अहमदनगर) आणि सुशीला गांधी (कन्नूभाईं मश्रुवाला यांच्या बहीण) यांनी केल्याच्या नोंदी आजही राष्ट्रीय शाळेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी