शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 13:04 IST

अकोला: राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत राज्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रस्तावांना पर्यावरणविषयक मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

- संतोष येलकरअकोला: राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत राज्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रस्तावांना पर्यावरणविषयक मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया रखडली होती. वाळू घाटांचे लिलाव अद्याप करण्यात आले नसल्याने, राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, वाळू घाटांच्या लिलावांसाठी पर्यावरण मान्यतेसाठी वाळू घाटांचे प्रस्ताव राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्याचा आदेश शासनामार्फत राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यानुसार वाळू घाटांचे प्रस्ताव जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयांमार्फत राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्यात आले. राज्य पर्यावरण समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील जिल्हानिहाय वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरणविषयक परवानगी देण्याची प्रक्रिया राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत गत ११ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे राज्यात रखडलेल्या वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया मार्गी लागणार आहे.रखडलेली बांधकामे लागणार मार्गी!वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडल्याने, वाळू टंचाईच्या स्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध बांधकामे, पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन अनुशेष योजनेंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे व खासगी बांधकामे रखडली होती. वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरणविषयक परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, आता वाळूअभावी रखडलेली बांधकामे मार्गी लागणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू