शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भरतीया रुग्णालयात मोफत कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST

ध्वजदिन निधीत योगदान द्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अकोला : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध हितकारी उपक्रमांमध्ये ...

ध्वजदिन निधीत योगदान द्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध हितकारी उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलित केला जातो. या निधीत प्रत्येकाने आपापले योगदान देऊन सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करावी. सर्व विभागांनी ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट ३१ जानेवारी २०२१ पूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनास आज जिल्हा नियोजन भवन येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, श्रीकांत देशपांडे, रामेश्वर पुरी, विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी व प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, सदाशिव शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपल्या निधीचे योगदान देऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. तसेच गतवर्षी उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केलेल्या जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी माहिती देण्यात आली की गेल्या वर्षी ६८ लाख ३० हजार रुपये इतक्या निधी संकलनाचे उद्दिष्ट होते त्यापैकी ९८ टक्के उद्दिष्ट हे पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.

अकोला येथील न्याय सेवा सदनाचे शनिवारी ई-उद्घाटन

अकोला : येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे अर्थात न्याय सेवा सदन या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे शनिवार, दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता ई-उद्घाटन होणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव स्वरूपकुमार बोस यांनी कळविले आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालय अकोला येथील ‘न्याय सेवा सदन’ या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन न्यायालय इमारतीचा ई-उद्घाटन समारंभ शनिवार, दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. ए. सय्यद यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे हे राहणार आहेत.