शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

 अकोला जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे चार हजार घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:57 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत शासनाने आता चार हजार घरकुले मंजूर केली. त्याचे तालुकानिहाय वाटप झाले आहे.

अकोला : आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणात पुढे आलेल्या आकडेवारीनुसार ‘२०२२ पर्यंत सर्वांनाच घरे’ ही घोषणा पूर्ण करण्याचे आव्हान शासनापुढे उभे ठाकले आहे. त्याचवेळी लाभार्थी संख्येच्या तुलनेत चालू वर्षी देण्यात आलेल्या घरकुलांची संख्या ५० टक्केच असल्याने ठरलेल्या कालावधीत सर्वांनाच घरकुले मिळतील, ही शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.देशभरात २०२२ पर्यंत सर्वांनाच घरे, या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींची संख्या निश्चित झाली आहे. त्या संख्येनुसार सर्वांनाच घरे देण्याचे आव्हान आता शासनापुढे उभे ठाकले आहे. सर्वेक्षणानुसार घरकुलासाठी अकोला जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात त्यापैकी ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक देण्यात आला. त्यातील घरकुलासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित आहेत. त्यांच्याकडे जागा नसल्याने मंजूर असलेल्या घरकुलांची संख्या केवळ कागदावरच आहे. त्यातच गेल्यावर्षीच्या तुलनेत शासनाने आता चार हजार घरकुले मंजूर केली. त्याचे तालुकानिहाय वाटप झाले आहे.

- गावांमध्ये लाभार्थी सर्वेक्षण सुरूघरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी जातीनिहाय सर्वेक्षणातील प्रपत्र ‘ब’ मध्ये आधीच तयार आहे. सर्वसाधारणसह इतरही लाभार्थींसाठी असलेली प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थींची नावे नमुना ‘ड’ मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गावात सर्वेक्षण झाले आहे.- मालकीच्या जागेसाठी अडणार लाभरमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी गावात स्वमालकीची जागा असल्याशिवाय तो मिळतच नाही. शेकडो लाभार्थी शासकीय जागेत राहतात. पूर्वी इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये राहतात, त्यांनाही मालकीच्या जागेचा पुरावा मिळत नसल्याने वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील शेकडो लाभार्थी वंचित असल्याने जिल्ह्यातील संख्या हजारो आहे. सर्वेक्षणानंतरही त्यांना घरकुल मिळेल की नाही, ही बाब शंकास्पद आहे.- उत्पन्नाची मर्यादा वाढवली!ग्रामीण भागात रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने उत्पन्न मर्यादा ठरवून दिली होती. त्यानुसार १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या लाभार्थींची निवड केली जात होती; मात्र तरीही सर्वेक्षण यादीत असलेले पात्र लाभार्थी वंचित होते. त्यांना लाभ मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवून ती १ लाख २० हजार रुपये करण्यात आली आहे.- गावांमध्ये दलाल सक्रियरमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष देऊन गावांमध्ये १० ते २५ हजार रुपये उकळणारे दलालही सक्रिय झाले आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवकही मागे नसल्याची उदाहरणे आहेत. काही पंचायत समितीमध्ये तर गटविकास अधिकारीच संबंधितांना घरकुल मंजुरीची संख्या देऊन रक्कम उकळण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचीही माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना