शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महान भागविणार चार महिने तहान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:02 IST

यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान  धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील  जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात  केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला  जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट पाहता  नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर  करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देशहरावरील जलसंकटाचे ढग गडद महान धरणात केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा  शिल्लक

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान  धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील  जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात  केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला  जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट पाहता  नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर  करण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्यावर महान ये थील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९00  व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील  जलकुंभांमध्ये पाण्याची साठवणूक केली जाते. यंदा मात्र  जलसंकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. जून महिन्यापासून ते आजपर्यंत पावसाच्या तीन  महिन्यांच्या कालावधीत अद्यापही समाधानकारक  पाऊस न झाल्यामुळे धरणातील जलसाठय़ात किंचितही  वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत  पाऊस आल्यास जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, लघू  प्रकल्पातील जलसाठय़ात कि ती वाढ होईल, याबाबत  साशंकता आहे. आजरोजी महान धरणात १५.४२ टक्के  जलसाठा शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पावसाचा अंदाज पाह ता महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने पाणी पुरवठय़ात कपात करून नागरिकांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन वेळापत्रक तयार केले  असून, त्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. या वेळा पत्रकानुसार आणि उपलब्ध जलसाठा पाहता  अकोलेकरांना चार महिन्यांपर्यंत पाणीपुरवठा करणे  महापालिकेला शक्य आहे. त्यानंतर पर्यायी स्त्रोतांचा  अवलंब करावा लागणार आहे. महापालिका पर्यायी स्रोतांची पाहणी करीत असून हे स्रो तही अपुर्‍या पावसामुळे पुरेसे ठरतील की नाही, ही  शंकाच आहे. अशा स्थितीमध्ये अकोलेकरांनीच  पाण्याचा काटकसरीचा मार्ग आतापासून स्वीकारला  पाहिजे. 

नागरिकांनो, परतीचा पाऊस साठवा!रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देण्याची गरजअपुर्‍या पावसामुळे यावर्षी पावसाळा संपण्याच्या आधीच  पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. अकोला शहरात  आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  असून, केवळ डिसेंबरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा  आहे. मूर्तिजापूरसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था शोधली  जात आहे, तर खांबोरा योजनेवरील ६१ गावांसाठी  टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही स्थिती पुढील  संकटाची चाहूल देणारी आहे. पावसाचे काहीच दिवस  शिल्लक असून, वरुणराजाने कृपा केली, तर जाता-जा ता सर्व धरणे भरून जातील, एवढाही पाऊस येऊ शक तो; मात्र केवळ याच आशेवर थांबून चालणार नाही. पर तीचा पाऊस पडेल व वाहून जाईल, असे होता कामा  नये. यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर  दिला पाहिजे. परतीचा पाऊस नक्कीच हजेरी लावेल,  असे अंदाज हवामान विभागाने दिले आहेत, त्यामुळे या  पावसाचे पाणी साठवता आले, तर किमान भूजल पा तळी वाढण्यास मदत होऊन पाणीटंचाईचे संकट  काहीअंशी कमी होऊ शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसोब तच विंधन विहीर पुनर्भरणाचाही उपक्रम राबविला  पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरातील बोअरची पातळी  वाढेल, ते बोअर पुन्हा रिचार्ज होईल, एवढी काळजी तरी  परतीच्या पावसात घेतली, तर त्या कुटुंबापुरता पाण्याचा  प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

संभाव्य पाणीटंचाईचे सावट लक्षात घेऊन पर्यायी  जलस्त्रोतांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी जल प्रदाय विभागाची यंत्रणा आतापासूनच कामाला लागली  आहे. प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरी  पाण्याच्या काटकसरीसाठी अकोलेकरांनी साथ देणे अ पेक्षित आहे.- अजय लहाने, आयुक्त, मनपा