शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

दररोज चार ते पाच शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:36 IST

सरासरी चार ते पाच रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कपाशीसह इतर पिकांंवर कीटनाशक फवारणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे फवारणीतून विषबाधेचे प्रमाणही वाढले आहे. सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला दाखल होणाºया रुग्णांमध्ये सरासरी चार ते पाच रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.फवारणीच्या कामांना वेग आला आहे; मात्र अनेक जण विविध प्रकारची रासायनिक औषधे एकत्र करून फवारणी करताना दिसून येतात. तर बहुतांश शेतकरी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक खबरदारी न घेता फवाणी करत असल्याचे आढळून येते. त्यामुळे फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातून विषबाधा झालेले रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात. सद्यस्थितीत सौम्य आणि मध्यम प्रभावातील रुग्ण दाखल होतात. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती सुरक्षात्मक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

विषबाधेचे इतरही रुग्ण!सध्या फवारणीतून विषबाधा झालेले चार ते पाच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत.याच प्रमाणात विष प्राशन करणाºया रुग्णांचाही समावेश आहे. म्हणजेच सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी आठ ते दहा रुग्ण हे विषबाधेचे दाखल होतात.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी कॉन्टॅक्ट पॉयझनिंगचे चार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. येथे उपचारासाठी येणारे रुग्ण हे अकोलासह शेजारच्या बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील आहेत.- डॉ. प्रशांत वान्देशकर,सीएमओ, सर्वोपचार

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र