शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याची सेना प्रवेशासाठी ‘लाॅबिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST

राजकारणामध्ये फार काळ काेणी काेणाचा मित्र अथवा शत्रू राहत नाही. या अलिखित नियमाच्या मार्गावरूनच राजकारणी त्यांची दिशा ठरवितात. तर ...

राजकारणामध्ये फार काळ काेणी काेणाचा मित्र अथवा शत्रू राहत नाही. या अलिखित नियमाच्या मार्गावरूनच राजकारणी त्यांची दिशा ठरवितात. तर दुसरीकडे स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणारे व एकमेकांना पाण्यात पाहणारे कार्यकर्ते कायम सतरंज्या उचलण्यापुरते मर्यादित राहतात, असे दिसून येते. ऑक्टाेबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत अकाेला पश्चिम मतदारसंघात पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याने दुसऱ्या राजकीय पक्षाचे तिकीट घेत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा अवघ्या २,३०० मतांच्या फरकाने पराभव झाला. साहजिकच या पराभवाचे खापर पक्षातून बंडखाेरी केलेल्या उमेदवारांच्या मस्तकी फुटणार हे स्वाभाविकच हाेते. त्यामुळे पक्षात ‘घर वापसी’चे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर या माजी पदाधिकाऱ्याने सेनेच्या स्थानिक लाेकप्रतिनिधीच्या घराचे दरवाजे ठाेठावले. यादरम्यान, सेनेतील काही माजी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सेनेचे संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्या माध्यमातून सेनेचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खा. अरविंद सावंत यांच्यासाेबत बैठक घडवून आणली.

सक्रिय पदाधिकाऱ्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न

आजराेजी इतर राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही दाेन गट आहेत. जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांचा गट पक्ष संघटनेला प्राधान्य देत असल्याचे बाेलल्या जाते. काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला पक्ष प्रवेश देऊन अकाेला पश्चिममधील सेनेच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांचे पंख छाटण्याच्या उद्देशातून दुसऱ्या गटाकडून ही खेळी खेळल्या जात असल्याची पक्षात चर्चा रंगली आहे.

पद आणि तिकिटाची हवी शाश्वती

काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला सेनेकडून शहर कार्यकारिणी अथवा जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाचे पद हवे असून, यासाेबतच मनपा निवडणुकीसाठी स्वत:ला किंवा मुलाला तिकीट देण्याची शाश्वती हवी असल्याची माहिती आहे.

? () -