शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांना पाणी मिळण्यासाठी बांधणार वनतळे

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

१७ वनविभागांमध्ये १९६ वनतळ्यांना मंजुरी

नीलेश शहाकार/बुलडाणा : दोन वर्षांपासून पडणार्‍या अल्प पावसामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत पूर्णत: आटले असून, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. त्याअनुषंगाने वन्यप्राण्यांना जंगलात पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी महसूल व वनविभागाच्या योजनेअंतर्गंत १९६ वनतळे आणि बंधार्‍यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. राज्यातील १७ वन्यविभागांमध्ये येणार्‍या ५९ वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना जंगलात सहज पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनतळे, वनबंधारे, पाणी साठवणारे बंधारे बांधण्यात येणार असून, यासाठी ५८४.६९ लक्ष रुपयांचा निधी देण्याचा निर्णय वनविभागाने ७ जुलै रोजी घेतला. नुकताच संपलेला उन्हाळा व त्यानंतर पावसाने दडी मारल्याने जंगलातील नाले, छोटेमोठे पाणी साठवून राहणार्‍या पाणथळीच्या जागा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांना तहान भागविण्याची कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी नव्याने बांधण्यात येणार्‍या वनतळे, वनबंधारे, तसेच सिमेंट बंधार्‍यांचा फायदा पुढच्या वर्षी वन्यजिवांना होणार आहे. *१७ वनविभागांचा समावेश औरंगाबाद वनवृत्तातील बीड, परळी, पाटोदा आणि धारुर, नागपुर वनवृत्तातील नागपूर, वर्धा आणि गोंदिया, धुळे वनवृत्तातील धुळे आणि जळगाव, यवतमाळ वनवृत्तातील यवतमाळ आणि पांढरकवडा, अमरावतीमधील पश्‍चिम मेळघाट, अमरावती आणि बुलडाणा, कोल्हापूर वनवृत्तातील सांगली, खानापूर आणि आटपाडी, तसेच गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली, घोट, मार्कंडा, चार्मोशी, पिरमिली, भामराड, एटापल्ली, कसनसूर, गट्ट, ताडगाव, सिरोंचा, असरअल्ली, गडचिरोली, उ.धानोरा, वडसा, देलनवाडी, कुरखेडा, पुराडा, बेडगाव, पोर्ला, आरमोरी आदी वनक्षेत्राचा या योजनेत समावेश आहे.