शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

वन विभाग घेणार शाळांमधील वृक्षारोपण मोहिमांचा लेखाजोखा

By admin | Updated: July 18, 2015 01:18 IST

वृक्षदिंड्यांची गत तीन वर्षांची माहिती संकलित करणार.

अकोला: राज्यातील शाळांमध्ये दरवर्षी राबविल्या जाणार्‍या वृक्षारोपण मोहिमांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी, यासाठी शाळांमधील वृक्षारोपण कार्यक्रमांची माहिती आता वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून संकलित केली जाणार आहे. त्याअनुषंगाने शाळांनी ही माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५जुलै रोजी जारी केले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्य प्राणी, जैवविविधता, तसेच दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्याचे संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वयातच जाणीव व आवड निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी ५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत साजरा होणार्‍या वन महोत्सवादरम्यान शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जातो. वृक्षदिंड्या काढून वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली जाते. या वृक्षारोपण मोहिमांमध्ये गत तीन वर्षांत किती झाडे लावली व त्यापैकी किती झाडे जगली, याची माहिती आता सामाजिक वनीकरण विभागाकडून घेतली जाणार आहे.राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यावर्षी राज्यातील शाळांमध्ये वृक्षारोपण योजना राबविण्यासंदर्भातील निर्देश १५ जुलै रोजी जारी केले. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक शाळांना २0 रोपांचे पॅकेज सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात येणार आहे. यामध्ये आंबा, चिंच, आवळा, कवळ, कापू, फणस, वड, पिंपळ, निम, गुलमोहर, चाफा आदी जातीची रोपं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शाळेच्या प्रांगणात लावलेल्या झाडांचे किमान चार वर्षे संगोपन करण्याची जबाबदारी शाळांची राहणार आहे.