शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सातपुड्याच्या पायथ्याशी वाघ असल्याचे निष्पन्न

By admin | Updated: July 7, 2017 01:42 IST

दोन दिवस रेस्क्यू आॅपरेशन राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. या पायथ्याशी असलेल्या मक्रमपूर येथील शेतशिवारात वाघ असल्याचे निष्पन्न झाल्याने ६ व ७ जुलै रोजी वन विभागातर्फे रेस्क्यू आॅपरेशन राबविल्या जात आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वान, अंबाबरवा, नरनाळा अशी अभयारणे आहेत. या अभयारण्यात वाघांच्या अधिवासाचे ठिकाण ठरले आहे; परंतु पाण्याच्या किंवा खाद्याच्या शोधार्थ वाघांनी आपला मोर्चा गावालगत असलेल्या शेतशिवारात वळविला असल्याचे दिसून येत आहे. ५ जुलै रोजी मौजे मक्रमपूर येथील नारायण भीमराव सोनोने यांच्या शेतात वन्य प्राणी वाघ असल्याचे मिळालेल्या ठशांवरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी ६ जुलै रोजी परिसराची वनाधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. शिवाय ७ जुलै रोजीसुद्धा रेस्क्यू आॅपरेशन राबविल्या जाणार आहे. या दरम्यान गावातील लोकं वाघ पाहण्याकरिता गर्दी करण्याची शक्यता असल्याने नियंत्रण करण्याकरिता अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा बंदोबस्तसुद्धा वनपरिमंडल अधिकारी ए.एन. बावणे यांनी मागविला आहे. शेतकऱ्यांत व शेतमजुरात वाघ दिसल्याच्या माहितीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत वाघाला पिटाळून लावण्याकरिता वन विभागाचे पथक रेस्क्यू आॅपरेशन राबवित आहेत.