शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदारांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, ...

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, दुकानदार, दूध-भाजीपाला, फळ विक्रेते आणि औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करून यासंदर्भात ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (५ एप्रिल) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था यासंदर्भात बैठकीत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ज्या व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. तसेच जे ४५ वर्षांच्या वयावरील आहेत, अशा लोकांचे लसीकरण करावे. त्यामध्ये जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. या लोकांचे घटकांचे लसीकरण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची उत्पन्न गटनिहाय यादी तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांची विशेष मोहीम राबवा!

शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते, बियाणे, अवजारे व यंत्रांची वाहतूक करणे सोपे व्हावे, यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून, जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत या रस्ते कामांसाठी लागणारे खडी, मुरुम, आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारणाचे उपचार करण्याकरिता उपविभागीय अधिकारीस्तरावर बैठका घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी दिले.