शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदारांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, ...

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, दुकानदार, दूध-भाजीपाला, फळ विक्रेते आणि औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करून यासंदर्भात ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (५ एप्रिल) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था यासंदर्भात बैठकीत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ज्या व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. तसेच जे ४५ वर्षांच्या वयावरील आहेत, अशा लोकांचे लसीकरण करावे. त्यामध्ये जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. या लोकांचे घटकांचे लसीकरण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची उत्पन्न गटनिहाय यादी तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांची विशेष मोहीम राबवा!

शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते, बियाणे, अवजारे व यंत्रांची वाहतूक करणे सोपे व्हावे, यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून, जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत या रस्ते कामांसाठी लागणारे खडी, मुरुम, आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारणाचे उपचार करण्याकरिता उपविभागीय अधिकारीस्तरावर बैठका घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी दिले.