शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदारांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, ...

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, दुकानदार, दूध-भाजीपाला, फळ विक्रेते आणि औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करून यासंदर्भात ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (५ एप्रिल) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था यासंदर्भात बैठकीत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ज्या व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. तसेच जे ४५ वर्षांच्या वयावरील आहेत, अशा लोकांचे लसीकरण करावे. त्यामध्ये जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. या लोकांचे घटकांचे लसीकरण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची उत्पन्न गटनिहाय यादी तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांची विशेष मोहीम राबवा!

शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते, बियाणे, अवजारे व यंत्रांची वाहतूक करणे सोपे व्हावे, यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून, जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत या रस्ते कामांसाठी लागणारे खडी, मुरुम, आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारणाचे उपचार करण्याकरिता उपविभागीय अधिकारीस्तरावर बैठका घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी दिले.