शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चित्रपटांमध्ये समाज प्रबोधनापेक्षा व्यावसायिकतेवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:57 IST

एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. 

ठळक मुद्देप्रा. अभिजित देशपांडे यांचे मत बाबूजी देशमुख वाचनालय नवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. त्यातून समाजहित, प्रबोधन, संदेशसुद्धा दिला पाहिजे. चित्रपट समजून घेताना, रसिकांनी त्यामागील अर्थकारण समजून घेत, साक्षर झालं पाहिजे आणि कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये, हे सुद्धा ठरविले पाहिजे, असे मत प्रा. अभिजित देशपांडे (मुंबई) यांनी व्यक्त केले. बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित नवरात्र व्याख्यानमालेत ते ‘चित्रपट समजून घेताना..’ विषयावर बोलत होते. गुरुवारी व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली. यावेळी विचारपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर, सचिव अनुराग मिश्र उपस्थित होते. प्रा. अभिजित देशपांडे यांनी, जगात निर्माण होणार्‍या अडीच हजार चित्रपटांपैकी भारतात दरवर्षी १२00 ते १५00 चित्रपट प्रदर्शित होतात. चीन, अमेरिकेपेक्षाही जास्त चित्रपट भारतात बनतात. माध्यमांनी समाज वेढलेला आहे. वेगाने प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. १८९६ पासून चित्रपट निर्मितीला प्रारंभ झाला. सुरुवातीला, त्यामध्ये समाज, प्रबोधन, गरिबी, दारिद्रय़ याला महत्त्व होते; परंतु आता चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन आहे. त्यातून मोठी अर्थप्राप्ती होत आहे. मनोरंजन आणि अर्थप्राप्तीतून चित्रपट निर्मिती होत आहे. त्यातून कोणतेही समाजहित जोपासले जात नाही. चित्रपट ही एक वैश्‍विक भाषा आहे; परंतु समाज, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्याला रसिक फार कमी आहेत. चित्रपट निर्मिती करताना, त्याला तंत्रज्ञानाचा, कॅमेर्‍याचा आधार लागतो. चित्रपट ही समूह कला आहे. असे सांगत, देशपांडे यांनी अलीकडच्या काळात चित्रपटांमध्ये भंपक, बीभत्स आणि खोट्या कल्पना अधिक मांडल्या जातात. श्रीमंती, अहंकाराचे प्रदर्शन करणारे सध्याचे चित्रपट आहेत. खूपच कमी चित्रपट समाज, देश, संस्कृती, कलेवर भर देतात. ग्रामीण जीवन, शेतकर्‍यांच्या समस्यांसह अनेक विषय चित्रपटातून हाताळता येतात; परंतु त्यातून पैसा मिळत नाही. त्यामुळे रसिकांनीसुद्धा चोखंदळ, साक्षर होऊन चित्रपट बघावे, असे आवाहनही त्यांनी केले. रसिकांची प्रगल्भता वाढली, तर त्यांच्या वैचारिक पातळीचे चित्रपट निर्माण होतील, अशी आशाही प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केली.