शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

कोमेजलेल्या पिकांना घोटभर पाण्याचा आधार!

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली आहेत.

अकोला : पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्‍या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्‍यांना डब्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्याही विलंबाने झाल्यात. त्यामुळे अगोदरच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामध्ये सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंंत ४ लाख २0 हजार ६३८ हेक्टर म्हणजेच ८७ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात सर्वाधिक २ लाख २२ हजार ७00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. त्यानंतर कापूस १ लाख १४ हजार १८९ हेक्टर, तूर ४५ हजार ८५३ , मूग १७ हजार, उडीद ८ हजार २५७, ज्वारी १0 हजार ७00, बाजरी ४0 हेक्टर, मका १0५, इतर तृणधान्य ३६ हेक्टर, इतर कडधान्य १३ हेक्टर, ऊस ५९ हेक्टर तर ज्यूट २८0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. एकतर दीड महिना उशिरा पाऊस आल्याने दीड महिना उशिरा पेरणी करावी लागली. पेरणी झाल्यांनतरही पाऊस नसल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. पावसामुळे बहुतांश ठिकाणी पिके उलटली आहेत. तर काही शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकर्‍यांना कर्ज काढून दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पीके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत. *पिकांची वाढ खुंटलीपाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे. त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही त्यांना पिके जगविण्यासाठीची कसरत करावी लागत आहे. *कीटकनाशकांचा खर्च वाढला पकावर कीड, रोगराई वाढल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशके, खताचा खर्च अतिरिक्त करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यावर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्‍यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.*पावसाची नितांत गरज येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिके जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.