शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजलेल्या पिकांना घोटभर पाण्याचा आधार!

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली आहेत.

अकोला : पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्‍या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्‍यांना डब्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्याही विलंबाने झाल्यात. त्यामुळे अगोदरच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामध्ये सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंंत ४ लाख २0 हजार ६३८ हेक्टर म्हणजेच ८७ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात सर्वाधिक २ लाख २२ हजार ७00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. त्यानंतर कापूस १ लाख १४ हजार १८९ हेक्टर, तूर ४५ हजार ८५३ , मूग १७ हजार, उडीद ८ हजार २५७, ज्वारी १0 हजार ७00, बाजरी ४0 हेक्टर, मका १0५, इतर तृणधान्य ३६ हेक्टर, इतर कडधान्य १३ हेक्टर, ऊस ५९ हेक्टर तर ज्यूट २८0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. एकतर दीड महिना उशिरा पाऊस आल्याने दीड महिना उशिरा पेरणी करावी लागली. पेरणी झाल्यांनतरही पाऊस नसल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. पावसामुळे बहुतांश ठिकाणी पिके उलटली आहेत. तर काही शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकर्‍यांना कर्ज काढून दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पीके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत. *पिकांची वाढ खुंटलीपाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे. त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही त्यांना पिके जगविण्यासाठीची कसरत करावी लागत आहे. *कीटकनाशकांचा खर्च वाढला पकावर कीड, रोगराई वाढल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशके, खताचा खर्च अतिरिक्त करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यावर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्‍यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.*पावसाची नितांत गरज येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिके जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.