शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

ग्रामपंचायत स्तरावर तयार राहणार पाच कामांचे नियोजन !

By admin | Updated: September 17, 2015 23:09 IST

दुष्काळी परिस्थितीत मजुरांना कामे उपलब्ध करण्यासाठी उपाययोजनेसंदर्भात नरेगा राज्य आयुक्ताचे निर्देश.

संतोष येलकर/अकोला: दुष्काळी परिस्थितीत मागणी येताच मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्याची उपाययोजना म्हणून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर किमान पाच कामांचे नियोजन तयार ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात नरेगाच्या राज्य आयुक्तांनी बुधवारी राज्यातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निर्देश दिले. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली आहे. नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, हाताला काम नसल्याने, दुष्काळग्रस्त भागातील शेतमजूरही आर्थिक संकटात सापडला. या पृष्ठभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यासह दुष्काळी भागातील गावागावांमध्ये मजुरांकडून कामासाठी मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने मजुरांकडून मागणी येताच, त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) तातडीने कामे उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान पाच मोठय़ा कामांचे नियोजन तयार ठेवण्याचे निर्देश नरेगाचे राज्य आयुक्त अभय महाजन यांनी बुधवारी 'व्हीडीओ कॉन्फरन्स'द्वारे दिले. मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्याच्या या उपाययोजनेत ग्रामपंचायतींनी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेऊन पाच कामे तयार ठेवण्याच्या सूचना नरेगा राज्य आयुक्तांनी दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी यांनी दुष्काळी परिस्थितीत मजुरांसाठी कामे उपलब्ध करून देण्याकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन, किमान पाच कामे तयार ठेवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश नरेगा राज्य आयुक्तांनी दिले असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार कामे तयार ठेवण्याचे नियोजन करण्याबाबत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पत्राव्दारे सूचना दिल्या जातील.