शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दीड एकरात रोवले पाच विजेचे खांब

By admin | Updated: May 25, 2017 21:00 IST

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंता, कंत्राटदाराचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : येथून जवळच असलेल्या कोळंबी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या दीड एकर शेतात वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराने शेतकऱ्याची पूर्वपरवानगी न घेता पाच विजेचे पोल रोवून  समोरील शेतकऱ्यासाठी वीज नेली. ही लाइन नेत असता विजेचे खांब शेताच्या धुऱ्यावरून नेले असते तर शेतकऱ्याने मनाई केली नसती; परंतु दीड एकरात मधोमध पाच विद्युत पोल रोवल्यामुळे या शेतकऱ्याला शेती वहितीसाठी अडचण जात असून, शेतकऱ्याने नुकतीच या गंभीर प्रकाराची तक्रार जिल्हा अधिकारी यांना दिली आहे.प्रमोद महादेवराव उमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराने शेतीच्या मधोमध पाच खांब गाडले आहेत, त्यामुळे शेती मशागतीसाठी अडचणी येत आहेत. याप्रकरणी वीज वितरणसह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे; मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या खरीप हंगामासाठी मशागतीची कामे सुरू आहेत. या खांबांमुळे मशागतीसाठी अनेक अडचणी येत आहेत. शेती हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे; परंतु वीज वितरण व कंत्राटदाराच्या मनमानीमुळे या शेतकऱ्याला शेतीची मशागत करण्यासाठी अडथळा निर्माण झाला असून, शेती वहिती करणे कठीण झाले आहे. शेती पिकविली नाही, तर कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, याची चिंता तक्रारकर्ता शेतकऱ्याला लागली आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असूनसुद्धा हा शेतकरी मानसिकदृष्ट्या खचून गेला असून, या प्रकरणाची त्वरित दखल घेण्याची मागणी प्रमोद उमाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.