शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी द्या!

By admin | Updated: September 26, 2016 03:14 IST

आ. सावरकर यांनी घेतली जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट.

अकोला, दि. २५- पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून द्यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. आ. सावरकर यांचा प्रस्ताव महाजन यांनी तातडीने पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.काटेपूर्णा, मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रकल्पांत दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून कोरडवाहू खरीप पिकांना आधार देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, असेही अकोला पूर्वचे आ. सावरकर यांनी म्हटले आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी विविध समस्यांवर जलसंपदा विभागाचे सचिव व्ही.एम. कुलकर्णी यांना निर्देश देऊन तातडीने बैठक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. कालव्यांची त्वरित दुरुस्ती करून खरीप हंगामात पेरणी झालेल्या तूर व कपाशी या हंगामी पिकांना संरक्षित सिंचन करणे तसेच येत्या रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करणे याकरिता ऑक्टोबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात यावे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे, उपविभागीय अभियंता पाटील व बोके हे अधिकारी उपस्थित होते. दुरुस्ती करताना लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांच्यासोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पांचा लाभ परिसरातील शेतकरी यांना व्हावा, यासाठी पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी खात्याचे अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार सावरकर यांनी क्षेत्रीय बैठका आयोजित केल्या आहेत.