शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मत्स्य बीज संचयन कागदावरच; क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:49 IST

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे.मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे.

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे. याकडे मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यां चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक जण शेततळ््यात मत्स्य संगोपन करतात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने लघू व इतर छोट्या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय थोडा मंदावला असला, तरी मोेठ्या प्रकल्पात काही प्रमाणात मासेमारी सुरू आहे. पण, ज्या तळ््यात मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. मत्स्य बीज ज्यावेळी सोडले जाते त्यावेळी त्याची नोंद घ्यावी लागते. जेवढे मत्स्य बीज सोडायचे सांगितले तेवढे सोडले की नाही, हे बघावे लागते. पण, याचा ताळेबंदच नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान, मत्स्य बीज संचयन केल्याच्या पुराव्यासाठी नियमाप्रमाणे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अध्यक्ष, गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील यांची सही घेतली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मत्स्य बीज संचयनयच्या वेळी मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची गरज असते. तेव्हाच किती मत्स्य बीज पाण्यात सोडण्यात आले, याची माहिती मिळेल; पण तसे होत नाही. मत्स्य व्यवसायला चालना देऊन संस्थांचे बळकटीकरण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करायच्या असतील, तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, प्राधिकृत अधिकारी,वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित.धानोरा (पाटेकर), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर