शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

मत्स्य बीज संचयन कागदावरच; क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:49 IST

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे.मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे.

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे. याकडे मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यां चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक जण शेततळ््यात मत्स्य संगोपन करतात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने लघू व इतर छोट्या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय थोडा मंदावला असला, तरी मोेठ्या प्रकल्पात काही प्रमाणात मासेमारी सुरू आहे. पण, ज्या तळ््यात मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. मत्स्य बीज ज्यावेळी सोडले जाते त्यावेळी त्याची नोंद घ्यावी लागते. जेवढे मत्स्य बीज सोडायचे सांगितले तेवढे सोडले की नाही, हे बघावे लागते. पण, याचा ताळेबंदच नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान, मत्स्य बीज संचयन केल्याच्या पुराव्यासाठी नियमाप्रमाणे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अध्यक्ष, गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील यांची सही घेतली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मत्स्य बीज संचयनयच्या वेळी मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची गरज असते. तेव्हाच किती मत्स्य बीज पाण्यात सोडण्यात आले, याची माहिती मिळेल; पण तसे होत नाही. मत्स्य व्यवसायला चालना देऊन संस्थांचे बळकटीकरण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करायच्या असतील, तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, प्राधिकृत अधिकारी,वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित.धानोरा (पाटेकर), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर