शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य बीज संचयन कागदावरच; क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:49 IST

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे.मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे.

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे. याकडे मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यां चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक जण शेततळ््यात मत्स्य संगोपन करतात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने लघू व इतर छोट्या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय थोडा मंदावला असला, तरी मोेठ्या प्रकल्पात काही प्रमाणात मासेमारी सुरू आहे. पण, ज्या तळ््यात मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. मत्स्य बीज ज्यावेळी सोडले जाते त्यावेळी त्याची नोंद घ्यावी लागते. जेवढे मत्स्य बीज सोडायचे सांगितले तेवढे सोडले की नाही, हे बघावे लागते. पण, याचा ताळेबंदच नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान, मत्स्य बीज संचयन केल्याच्या पुराव्यासाठी नियमाप्रमाणे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अध्यक्ष, गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील यांची सही घेतली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मत्स्य बीज संचयनयच्या वेळी मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची गरज असते. तेव्हाच किती मत्स्य बीज पाण्यात सोडण्यात आले, याची माहिती मिळेल; पण तसे होत नाही. मत्स्य व्यवसायला चालना देऊन संस्थांचे बळकटीकरण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करायच्या असतील, तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, प्राधिकृत अधिकारी,वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित.धानोरा (पाटेकर), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर