शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यातील पहिले सौर शीतगृह अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:46 IST

अकोला : राज्यातील पहिले सौर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. दरम्यान, नागपूरनंतर राज्यातील दुसरी केळी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा जळगाव खान्देशला होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने २ कोटी ९१ लाख रुपये मंजूर केले आहेत.

ठळक मुद्देमहाबीजचा उपक्रममूळ बियाण्यांचे करणार संवर्धनजळगावला होणार दुसरी टिश्यू कल्चर लॅब

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील पहिले सौर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. दरम्यान, नागपूरनंतर राज्यातील दुसरी केळी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा जळगाव खान्देशला होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने २ कोटी ९१ लाख रुपये मंजूर केले आहेत.महाबीजने राज्यात गोदामांची शंृखला तयार केली असून, शेतकर्‍यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे. हायब्रीड भाजीपाला बियाणे उत्पादनावर भर देण्यात येत आहे. यासाठी लागणारे बियाणे शीतगृहात ठेवावी लागतात. याच पृष्ठभूमीवर महाबीजने शीतगृह उभारणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सौर विजेवर हे शीतगृह निर्माण करण्यात येणार आहे. महाबीजच्या मुख्यालयांतर्गत शिवणी येथे शीतगृह उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुदा हे एकमेव सोलरवर चालणारे शीतगृह आहे.आता पुन्हा टिश्यू कल्चर संशोधनावर भर दिला जाणार असून, राज्यात नागपूर येथे टिश्यू कल्चर प्रयोगशाळा आहे; परंतु केळीचे उत्पादन हे जळगाव जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जात असल्याने जळगाव खान्देशला टिश्यू कल्चर प्रयोग शाळा असावी, यासाठीचा प्रस्ताव व प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्या प्रकल्पाला केंद्र शासनाने २ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच नागपूर येथील टिश्यू कल्चर प्रयोग शाळाही सुरू च राहणार आहे. राज्यात महाबीजची २३ जिल्हय़ात कार्यालये आहेत. उर्वरित जिल्हय़ातही जागा मागणीचा प्रस्ताव महाबीजने तयार केला असून, शासनामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तेथे प्रक्रिया केंद्र व गोदाम उभारण्यात येणार आहेत. 

हायब्रीड भाजीपाला संशोधनावर भर देण्यात आला आहे. या बियाण्यांची थंड ठिकाणी साठवण करावी लागते. तसेच मूळ संशोधित बियाणेदेखील थंड ठिकाणी ठेवावे लागते. यासाठीच शीतगृह उभारण्यात येत आहे. पण, त्यासाठी औष्णिक विजेचा वापर न करता सोलर विजेचा उपयोग करण्यात येणार आहे. या शीतगृहाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. टिश्यू कल्चर लॅब जळगावला होणार आहे.- ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.-