शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST

अमोल सोनोने पांढुर्णा : जंगलाला आगी लागू नये, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात ...

अमोल सोनोने

पांढुर्णा : जंगलाला आगी लागू नये, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात वन व वन्यजीव विभागात फायर लाईनची कामे केली जातात. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यानंतर फायर वॉचर व अंगारीवर लाखो रुपये खर्ची पडल्याचे दाखविले जाते. पण, यावर्षी ही फायर लाईनची कामे कुचकामी ठरली. आलेगाव वनपरिक्षेत्रात दररोज आगी लागल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वनसंपदेचे नुकसान होत आहे. त्यामुळे लागलेल्या आगीच्या घटनांची, प्रत्यक्ष जळालेल्या जंगल क्षेत्राची, झालेल्या नुकसानाची चौकशीची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

पातूर तालुक्यातील सर्व बीटमध्ये दररोज आगीच्या घटना घडत आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात. याबाबत वनविभागाला माहिती असल्याने डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जाळरेषेच्या माध्यमातून वनक्षेत्राचे सभोवताल तसेच वनातून जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूचे गवत काढले जाते. पण, वनाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून प्रामाणिकपणे पूर्ण जाळरेषेचे काम केले जात नसल्यामुळे वनांना आग लागते, असे वनक्षेत्रालगत गावांतील नागरिकांचे म्हणणे आहे. आलेगाव वन परिक्षेत्रात वन व वन्यजीव विभागामार्फत फायर लाईनची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत; मात्र आगीच्या घटना वाढत असल्याने ही कामे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. (फोटो)

-------------------------------------------------------

रस्ता अपघातात वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात

उन्हाळा लागल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. अपघात टाळण्यासाठी जंगलाला जाळी लावण्यात यावी, अशी मागणी परिसरातील लोक करत आहेत

------------------------------------------ - - - - - - - - - - - - -

या सर्व बीटमध्ये दररोज आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

पांढुर्णा २ पिंपळडोळी १ पिंपळडोळी २ सोनुना १ सोनुना २ भोरद शेकापूर १ शेकापूर २ पाचरण

---------------------- ----------- ----------------------

जंगलामध्ये परिसरातील लोक मोह वेचण्यासाठी झाडाखाली पालापाचोळा जाळून टाकत आहेत. त्यामुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर गावातील लोकांनी आम्हाला जंगल जाळणाऱ्यांची माहिती द्यावी. आम्ही कारवााई करू.

-सतीश नालींदे, वन वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव.