शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST

अमोल सोनोने पांढुर्णा : जंगलाला आगी लागू नये, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात ...

अमोल सोनोने

पांढुर्णा : जंगलाला आगी लागू नये, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात वन व वन्यजीव विभागात फायर लाईनची कामे केली जातात. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यानंतर फायर वॉचर व अंगारीवर लाखो रुपये खर्ची पडल्याचे दाखविले जाते. पण, यावर्षी ही फायर लाईनची कामे कुचकामी ठरली. आलेगाव वनपरिक्षेत्रात दररोज आगी लागल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वनसंपदेचे नुकसान होत आहे. त्यामुळे लागलेल्या आगीच्या घटनांची, प्रत्यक्ष जळालेल्या जंगल क्षेत्राची, झालेल्या नुकसानाची चौकशीची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

पातूर तालुक्यातील सर्व बीटमध्ये दररोज आगीच्या घटना घडत आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात. याबाबत वनविभागाला माहिती असल्याने डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जाळरेषेच्या माध्यमातून वनक्षेत्राचे सभोवताल तसेच वनातून जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूचे गवत काढले जाते. पण, वनाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून प्रामाणिकपणे पूर्ण जाळरेषेचे काम केले जात नसल्यामुळे वनांना आग लागते, असे वनक्षेत्रालगत गावांतील नागरिकांचे म्हणणे आहे. आलेगाव वन परिक्षेत्रात वन व वन्यजीव विभागामार्फत फायर लाईनची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत; मात्र आगीच्या घटना वाढत असल्याने ही कामे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. (फोटो)

-------------------------------------------------------

रस्ता अपघातात वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात

उन्हाळा लागल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. अपघात टाळण्यासाठी जंगलाला जाळी लावण्यात यावी, अशी मागणी परिसरातील लोक करत आहेत

------------------------------------------ - - - - - - - - - - - - -

या सर्व बीटमध्ये दररोज आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

पांढुर्णा २ पिंपळडोळी १ पिंपळडोळी २ सोनुना १ सोनुना २ भोरद शेकापूर १ शेकापूर २ पाचरण

---------------------- ----------- ----------------------

जंगलामध्ये परिसरातील लोक मोह वेचण्यासाठी झाडाखाली पालापाचोळा जाळून टाकत आहेत. त्यामुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर गावातील लोकांनी आम्हाला जंगल जाळणाऱ्यांची माहिती द्यावी. आम्ही कारवााई करू.

-सतीश नालींदे, वन वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव.