शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोना रुग्ण वाढल्याने खासगी वाहतूकदारांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 10:43 IST

Akola Travels Bus दररोज सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या ४० वरून एकाएकी १५ ते १७ वर आली आहे.

अकोला : शहरातून राज्यात व परराज्यात खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासी वाहतूक केली जाते. कोरोनामुळे या वाहतूकदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. येथून दररोज सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या ४० वरून एकाएकी १५ ते १७ वर आली आहे. तब्बल आठ ते नऊ महिन्यांच्या नुकसानीनंतर आता कुठे व्यवसाय रुळावर येऊ पाहात होता. मात्र, शहरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा संकट उभे ठाकले आहे.

अकोला शहरातून मुंबईसह सुरत, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नाशिक या लांब पल्ल्याच्या तसेच अमरावती, वर्धा, जळगाव, खान्देश या शहरांसाठी वातानुकूलित आणि साध्या ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणावर सुटतात. शहरातून दररोज सुमारे ३५ ते ४० ट्रॅव्हल्स सुटत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी हा व्यवसाय तेजीत होता. मात्र, लॉकडाऊनपासून या व्यवसायावर अवकळा आली आहे. यंदा पुन्हा १५ फेब्रुवारीपासून लॉकडाऊन लागू झाले. प्रवाशांची संख्या घटली. प्रशासनाने ५० टक्के प्रवासी घेऊन वाहने चालविण्याची परवानगी दिली. मात्र, खर्च परवडत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी फेऱ्या बंद व कमी केल्या. अनेकजण नाईलाजाने कमी प्रवासी घेऊन सेवा देत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स वाहतूकदार चिंतेत पडले आहेत.

 

गाडी रूळावर येत होती पण...

जवळपास नऊ महिने सर्व व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू पुन्हा व्यवसाय रूळावर येत होते. ट्रॅव्हल्स ५० टक्के क्षमतेने धावू लागल्या होत्या. आता पुन्हा रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ट्रॅव्हल्स बंद ठेवाव्या लागत आहेत.

 

प्रवासी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक ट्रॅव्हल्स उभ्या आहेत. त्यात सॅनिटायझेशनचा खर्च वाढला आहे.

विनोद जकाते, ट्रॅव्हल्स मालक

 

ऐन लग्नसराई व होळीसारख्या सणाच्या काळात कोरोना वाढल्याने व्यवसाय ठप्प पडला आहे. प्रवाशांची संख्याही रोडावली आहे. डिझेलचा खर्च काढणे कठीण झाले आहे.

प्रकाश डुकरे, ट्रॅव्हल्स मालक

 

प्रवासी येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, टॅक्स कसा भरायचा, असा प्रश्न समोर आहे. नाईलाजास्तव गाडी बंद ठेवावी लागत आहे.

महेश बोकाडे, ट्रॅव्हल्स मालक

 

रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या

४०

सध्याची संख्या

१५ ते १७

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या