शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

अखेर... पिंपळखुटा वाहळा मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

नासीर शेख खेट्री : २२ महिन्यांपासून रखडलेल्या पिंपळखुटा वाहळा मार्गावरील पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. कागदाेपत्री भूमिपूजन करून काम ...

नासीर शेख

खेट्री : २२ महिन्यांपासून रखडलेल्या पिंपळखुटा वाहळा मार्गावरील पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. कागदाेपत्री भूमिपूजन करून काम थांबल्याचा आराेपी परिसरातील नागरिकांनी केला हाेता. याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’मध्ये ६ डिसेंबर राेजी प्रकाशित केले हाेते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आता पुलाच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अकोला-बुलडाणा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले पिंपळखुटा वाहळा मार्गावरील पिंपळखुटा जवळील नदीवरील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुलाचे २०२०च्या ९ फेब्रुवारी रोजी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या अध्यक्षतेखाली माजी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. तेव्हापासून पुलाचे बांधकाम बंद हाेते. पुलाअभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत हाेता. या समस्येचा लाेकमतने सातत्याने पाठपुरावा केला. कंत्राटदाराने नदीत खड्डे खाेदून काम अर्धवट साेडले हाेते. २२ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पुलाच्या कामाला सुरुवात केली नव्हती. या पुलाचे काम रखडल्याने पिंपळखुटा, चान्नी, शिरपूर, चांगेफळ, उमरा, पांगरा, आडगाव आदी गावांतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन नदीतून ये-जा करावी लागत आहे. नदीमध्ये पाणी व मोठमोठे दगड असल्याने पिंपळखुटा, गावात एसटी बस, दुचाकी, चारचाकी व इतर कोणतेही वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करून ये-जा करावी लागत आहे. भूमिपूजन केल्यानंतर कामासाठी खोदलेले खड्डे धोकादायक ठरत आहे. कंत्राटदारांचे खड्डे खोदले ते धोकादायक ठरत असून, अनेक वेळा लहान मुले व शेतकऱ्यांची जनावरे या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

...........................

२५ गावांना मिळणार दिलासा

खामगाव येथे मोठी बाजारपेठ असल्याने पिंपळखुटा परिसरात जवळपास २५ ते ३० गावांना शेतमाल विक्री किंवा इतर कामासाठी खामगावजवळ आहे. त्यामुळे पुलाचे काम झाल्यावर या परिसरात २५ ते ३० गावांना दिलासा मिळणार आहे.