शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

अखेर अपहृत व्यावसायिक घरी सुखरूप पोहोचले!

By आशीष गावंडे | Updated: May 16, 2024 05:18 IST

कुटुंबीयांसह पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास

आशिष गावंडे, अकाेला: चार जीन परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यावसायीक अरुणकुमार वाेरा अखेर दोन दिवसांच्या कालावधीनंतर बुधवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पोलीस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दगडी पुलानजीकच्या चार जिन परिसरातील व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांचे १३ मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते.त्यांचे  अपहरण हाेऊन दाेन दिवसांचा कालावधी झाला होता. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार रामदास पेठ पाेलिसांनी अपहृत वाेरा यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे इनाम जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणातील आराेपींचा शाेध घेऊन वाेरा यांना घरी सुरक्षित आणन्याच्या उद्देशातून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासोबत आ.सावरकर यांनी भ्रमध्वनीवरून चर्चा करीत या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याची मागणी केली होती. यावेळी आ.सावरकर यांनी अरुणकुमार वाेरा यांच्या कुटंबियांची भेट घेतली होती.

शिवसेनेने दिले निवेदन

अपहृत व्यावसायीक अरुणकुमार वाेरा यांचा तातडीने शाेध घेण्याची मागणी करीत बुधवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी तसेच रामदास पेठ पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक शरद तुरकर, तरुण बगेरे, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, संजय अग्रवाल, देवा गावंडेसह अनेक शिवसैनिक उपस्थित हाेते. 

शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायीकाचे अपहरण झाल्यामुळे इतर व्यावसायिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात आम्ही जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासाेबत पत्रव्यवहार करून उद्या त्यांची भेट घेणार होतो. अरुण कुमार घरी परत आल्याचा आनंद आहे. - निकेश गुप्ता अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स अकाेला जिल्हा

व्यावसायीक वाेरा यांच्या अपहरण प्रकरणामुळे शहरात निर्भयपणे व्यापार,व्यवसाय करणाऱ्यांच्या मनात एक अनाहुत भीती निर्माण झाली होती. आम्ही सर्वजण वाेरा कुटुंबियांच्या पाठीशी आहाेत. प्रत्येक व्यावसायीकाने सीसीटीव्ही लावणे क्रमप्राप्त आहे. वोरा रात्री घरी परत आल्याचे समाधान आहे. - शैलेश खराेटे अध्यक्ष, सराफा असाेसिएशन अकाेला

टॅग्स :Akolaअकोला