शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अखेर रविवारचे ‘लॉकडाऊन’ही लवकरच संपणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 10:24 IST

शनिवारचे लॉकडाऊन बंद केल्यानंतर आता रविवारचेही लॉकडाऊन संपण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून मिळाले आहेत.

अकोला : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दोन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यापैकी शनिवारचे लॉकडाऊन बंद केल्यानंतर आता रविवारचेही लॉकडाऊन संपण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून मिळाले आहेत. सध्या दर रविवारी करण्यात येणाºया लॉकडाऊनचा आदेश ३१ आॅगस्टपर्यंत कायम असल्याने सप्टेंबर महिन्याचा पहिला रविवार हा लॉकडाऊन मुक्त राहणार असल्याचे संकेत आहेत.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला, तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) अन्वये १ आॅगस्टपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत १ आॅगस्टपासून बाजारपेठेतील सम-विषम नियम रद्द करत सर्व दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, दर रविवारी संपूर्ण लॉकडॉऊन पाळण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी केवळ दुकानांपुरतीच झाल्याचे दिसून आले. दर रविवारी शहरातील संचारबंदीमध्ये काही भागांत खुलेआम उल्लंघन होत असताना, पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रस्त्यावरची वाहतूक व वर्दळसुद्धा कमी झाली नाही, त्यामुळे हे लॉकडाऊन केवळ औपचारिकता ठरले होते. अखेर ते रद्द होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिले आहेत.

दक्षता घेणे आवश्यकच !अनलॉकची प्रक्रिया आता दिवसेंदिवस व्यापक होत असल्याने प्रत्येकाने आता दक्षता घेणे अधिक गरजेचे आहे. चेहºयावर मास्क लावावा. फिजिकल डिस्टन्सिंग व कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत शासनाचे आदेश व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. बाजारपेठा व दुकाने सुरू ठेवताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तपासण्या, स्वच्छता, निर्जंंतुकीकरण आदीचे पालन करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

सण-उत्सव काळात आल्या अडचणी‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. आता सण-उत्सवांच्या दिवसांत संचारबंदीच्या आदेशाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. आॅगस्ट महिन्यातील पहिलाच रविवार लॉक असल्याने रक्षाबंधन सणावर परिणाम झाल्याच्या तक्रारी होत्या तर वंचित बहुजन आघाडीने चक्क राखी विक्रीचे दुकान थाटूनच या लॉकडाऊनचा विरोध प्रत्यक्षात नोंदविला होता. अनेक उद्योग, व्यवसायांना या काळात समस्या उद्भवत असल्याने हा लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता संचारबंदी उठविण्याचे संकेत आहेत.

विशेष मोहिमेची गरजबाजारपेठेत अनेक लोक विनामास्क फिरतात. गुटखा अन् खर्रा विक्रीवरचे बंधने उठविल्याने आता शौकिनांसाठी रान मोकळे झाले आहे. कुठेही थुंकण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहनावरून जाताना दुचाकीस्वार तोंडातील गुटख्याची पिचकारी खुलेआम सोडतात. त्यामुळे आता कारवाया थंडावल्याने विशेष मोहिमेची गरज आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक