शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाच्या जागेचा मार्ग मोकळा!

By admin | Updated: May 27, 2017 00:05 IST

डॉ. पं.दे.कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समितीचे शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने अकोला येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे; पण महाविद्यालयासाठी लागणारी जागाच अद्याप मिळाली नसल्याने, नवीन पदवी महाविद्यालयाचे काम रखडले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समितीने या जागेचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. आता हे महाविद्यालय वाशिम रोडवर होणार आहे. यासंदर्भात लोकमतने पाठपुरावा केला होता हे विशेष.अकोला येथे राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. याकरिता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला पाच कोेटी रुपये निधी दिला आहे. महाविद्यालयाला व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडियाच्या निकषानुसार जागा हवी आहे; पण दोन वर्षांपासून जागाच उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. त्यामुळे या महाविद्यालयासाठी मिळालेला निधी परत जाण्याची वेळ आली होती. या पृष्ठभूमीवर आमदार गोपीकिशन बाजोरिया अध्यक्ष असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समितीने यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी या समितीची सभा कृषी विद्यापीठात बोलावली होती. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आमदार बाजोरिया यांच्यासह कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद व या समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर, गोपी ठाकरे व नितीन हिवसे यांची उपस्थिती होती. या बैठकीत कृषी विद्यापीठाची वाशिम रोडवर असलेली जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदल्यात महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठ त्यांच्याकडे असलेली तेवढीच जागा विद्यापीठाला देणार आहे. या निर्णयामुळे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या जागेवर प्रशस्त महाविद्यालय होणार आहे. येथे बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६० विद्यार्थी प्रवेश घेतील. पदवी अभ्यासक्रम पाच वर्षाचा असल्याने ३०० विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२० विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत.दरम्यान, शहरातील सरकारी बगीचा येथेही माळी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.सूपिकजमिनीचा ताबा वाशिम रोडवरील क्षेत्रावर कृषी विद्यापीठाचे संशोधन चालते. येथे पाणी भरपूर आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने गुडधी येथील जागेचा प्रस्ताव ठेवला होता; पण समितीने याच जागेचा निर्णय घेतल्याने त्याचा संशोधनवर परिणाम होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.