शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अखेर अमरावती विभाागात पाणीटंचाई उपाययोजनांसाठी दिला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:00 IST

अकोला : जूनपर्यंतच्या काळातील पाणीटंचाईसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठीचा निधी अखेर शासनाने दिला. हा निधी मिळण्यासाठी राज्यातील चार विभागीय आयुक्तांनी जूनमध्येच शासनाकडे मागणी केली होती, हे विशेष.

ठळक मुद्दे शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.पाणीटंचाईचा निधी खर्च करण्याची मुदतही आॅगस्ट अखेरची असताना हा निधी देण्याला शासनाकडूनच उशीर करण्यात आला.चारही महसूल विभागातील पाणीटंचाई उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी शासनाने १०४ कोटी रुपये दिले.

अकोला : जूनपर्यंतच्या काळातील पाणीटंचाईसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठीचा निधी अखेर शासनाने दिला. हा निधी मिळण्यासाठी राज्यातील चार विभागीय आयुक्तांनी जूनमध्येच शासनाकडे मागणी केली होती, हे विशेष. त्यासाठी १०४ कोटी निधीपैकी ७५ कोटी अमरावती विभागाला देण्यात आला.गेल्यावर्षी राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यासाठी झालेल्या खर्चापोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला नाही. त्यामुळे राज्यातील चार विभागीय आयुक्तांनी शासनाकडून निधी मिळण्यासाठीचे पत्र जूनमध्येच दिले. विभागीय आयुक्त अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद यांच्या मागणीनुसार दोन महिने उशिराने हा निधी देण्यात आला. त्याचवेळी पाणीटंचाईचा निधी खर्च करण्याची मुदतही आॅगस्ट अखेरची असताना हा निधी देण्याला शासनाकडूनच उशीर करण्यात आला.चारही महसूल विभागातील पाणीटंचाई उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी शासनाने १०४ कोटी रुपये दिले. त्यातून २०१७-१८ च्या टंचाई काळातील ग्रामीण व नागरी भागातील उपाययोजनांची प्रलंबित देयके अदा करण्याचे म्हटले आहे. कंत्राटदारांना थेट इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसद्वारे वितरित करण्याचे बजावले.- टंचाई उपाययोजनांच्या माहितीनंतरच निधीयापुढे पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना त्याबाबतची संपूर्ण माहिती शासनाला द्यावी लागणार आहे. टंचाई निवारणासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना कोणत्या कालावधीसाठी आहेत, त्यासाठी किती निधी लागणार आहे, तसेच त्या उपाययोजनांसाठी आधी खर्च झाला का, या बाबीची माहिती घेऊनच प्रस्ताव सादर करण्याचेही शासनाने बजावले.- ‘जीपीएस’ नसलेल्या टँकरचे देयक रोखाटंचाईच्या काळात खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा झाला असल्यास त्यावर ‘जीपीएस’प्रणाली कार्यरत असणे आवश्यक आहे. आता टंचाई निधीतून देयक अदा करताना ज्या टँकरवर ही प्रणाली कार्यरत नसेल, त्याचे देयक अदा करू नये, जीपीएस प्रणाली नसताना टँकरधारकाने मारलेल्या फेºयांचा दावा मान्य करू नये, त्यामुळे आता जीपीएस नसलेले टँकरधारक गोत्यात येणार आहेत.

अमरावती विभागात वाटप झालेला निधीजिल्हा                     निधी (कोटी)अमरावती                   १४.९६अकोला                       ११.७८वाशिम                       १०.५४बुलडाणा                     १८.०१यवतमाळ                   २०.६९

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावती