शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते नागपूर सुपर कम्युनिकेशन महामार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात.

By admin | Updated: June 16, 2016 02:13 IST

२६ जिल्हे जोडणार जाणार असून ३0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काशीनाथ मेहेत्रे/ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): मुंबई ते नागपूर दरम्यान ७४४ किलोमीटर लांबीच्या व १२0 मीटर रुंदी असलेल्या आठपदरी सुपर कम्युनिकेशन महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर सुपर एक्स्प्रेस महामार्ग महाराष्ट्र प्रोस्पॅरिटी कॉरिडॉर रस्त्याच्या अनुषंगाने क्षेत्रविकास आठपदरी १00 फुटांचे डिव्हायडर इंटरचेंजवरूनच आत प्रवेश ठेवला जाणार आहे. सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार ८0 किलोमीटर प्रतितास वेगाने मुंबई ते पुणे दरम्यान गाड्या धावतात; परंतु या महामार्गावर कायद्यात बदल करून वेगर्मयादा १५0 किमी प्रतितास करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर जाण्यासाठी फक्त सहा तास लागणार आहे तसेच डिव्हायडरमधून गॅस पाइप लाइन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क व इतर अनेक सुविधा करण्यात येणार आहेत. या रस्त्यावर २२ ठिकाणी इंटरचेंजसाठी १२५ हेक्टर जमीन लागणार आहे. तेथेच रस्त्याच्या बाजूला टोल नाके राहणार आहेत.  सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्यात असून निविदा प्रक्रिया ऑगस्ट २0१६ पासून सुरू होईल व डिसेंबर २0१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन सहा टप्प्यांत २0१९ मध्ये काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी भूमी संपादन कायद्यानुसार न घेता, ह्यआंध्र प्रदेश पॅटर्नह्णनुसार घेतली जाणार आहे. यामध्ये (लँड पूल) शेतकर्‍यांनी स्वत: जमीन विनामोबदला द्यायची असून, त्या बदल्यात ज्या ठिकाणी शासन शहर विकसित करणार आहे, त्या शहराच्या ठिकाणी मोबदला म्हणून अशा शेतकर्‍यांना २0, २५ टक्क्याचे विकसित भूखंड देण्यात येणार आहेत. जे शेतकरी स्वत: जमीन देणार नाही, त्यांच्या जमिनी महामार्ग अँक्टनुसार संपादित करण्यात येणार आहेत; मात्र त्यांना विकसीत भूखंडाचा लाभ घेता येणार नाही. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्या, त्या बागायतदार शेतकर्‍यांना ५0 ते ६0 हजार प्रतिहेक्टर वार्षिक उदरनिर्वाहासाठी देण्यात येणार आहे, असेही या प्रकल्पामध्ये प्रस्तावित आहे. * ३0 हजार हेक्टर जमीन, ३0 हजार कोटींचा प्रोजेक्ट.* मुंबई ते नागपूर ७४४ किलोमीटर अंतराचा १२0 मीटर रुंद आठपदरी मार्ग.* कायदा बदलून ताशी १५0 किलोमीटर वेगाची र्मयादा.* विमान उतरविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हाय-वेवर धावपट्टी.* सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात, ऑगस्टपासून टेंडर प्रक्रिया सुरू होणार.* डिसेंबर २0१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात, सहा टप्प्यांमध्ये काम सुरू होणार असून, २0१९ पर्यंत काम पूर्ण होईल.* सुपर कम्युनिकेशन हाय-वेसाठी ३0 हजार हेक्टर जमीन लागणार.* हाय-वेवर २६ जिल्हे जोडले जाणार असून, २२ ठिकाणी इंटरचेंज पॉइंट राहणार