शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

मुंबई ते नागपूर सुपर कम्युनिकेशन महामार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात.

By admin | Updated: June 16, 2016 02:13 IST

२६ जिल्हे जोडणार जाणार असून ३0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काशीनाथ मेहेत्रे/ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): मुंबई ते नागपूर दरम्यान ७४४ किलोमीटर लांबीच्या व १२0 मीटर रुंदी असलेल्या आठपदरी सुपर कम्युनिकेशन महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर सुपर एक्स्प्रेस महामार्ग महाराष्ट्र प्रोस्पॅरिटी कॉरिडॉर रस्त्याच्या अनुषंगाने क्षेत्रविकास आठपदरी १00 फुटांचे डिव्हायडर इंटरचेंजवरूनच आत प्रवेश ठेवला जाणार आहे. सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार ८0 किलोमीटर प्रतितास वेगाने मुंबई ते पुणे दरम्यान गाड्या धावतात; परंतु या महामार्गावर कायद्यात बदल करून वेगर्मयादा १५0 किमी प्रतितास करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर जाण्यासाठी फक्त सहा तास लागणार आहे तसेच डिव्हायडरमधून गॅस पाइप लाइन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क व इतर अनेक सुविधा करण्यात येणार आहेत. या रस्त्यावर २२ ठिकाणी इंटरचेंजसाठी १२५ हेक्टर जमीन लागणार आहे. तेथेच रस्त्याच्या बाजूला टोल नाके राहणार आहेत.  सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्यात असून निविदा प्रक्रिया ऑगस्ट २0१६ पासून सुरू होईल व डिसेंबर २0१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन सहा टप्प्यांत २0१९ मध्ये काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी भूमी संपादन कायद्यानुसार न घेता, ह्यआंध्र प्रदेश पॅटर्नह्णनुसार घेतली जाणार आहे. यामध्ये (लँड पूल) शेतकर्‍यांनी स्वत: जमीन विनामोबदला द्यायची असून, त्या बदल्यात ज्या ठिकाणी शासन शहर विकसित करणार आहे, त्या शहराच्या ठिकाणी मोबदला म्हणून अशा शेतकर्‍यांना २0, २५ टक्क्याचे विकसित भूखंड देण्यात येणार आहेत. जे शेतकरी स्वत: जमीन देणार नाही, त्यांच्या जमिनी महामार्ग अँक्टनुसार संपादित करण्यात येणार आहेत; मात्र त्यांना विकसीत भूखंडाचा लाभ घेता येणार नाही. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्या, त्या बागायतदार शेतकर्‍यांना ५0 ते ६0 हजार प्रतिहेक्टर वार्षिक उदरनिर्वाहासाठी देण्यात येणार आहे, असेही या प्रकल्पामध्ये प्रस्तावित आहे. * ३0 हजार हेक्टर जमीन, ३0 हजार कोटींचा प्रोजेक्ट.* मुंबई ते नागपूर ७४४ किलोमीटर अंतराचा १२0 मीटर रुंद आठपदरी मार्ग.* कायदा बदलून ताशी १५0 किलोमीटर वेगाची र्मयादा.* विमान उतरविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हाय-वेवर धावपट्टी.* सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात, ऑगस्टपासून टेंडर प्रक्रिया सुरू होणार.* डिसेंबर २0१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात, सहा टप्प्यांमध्ये काम सुरू होणार असून, २0१९ पर्यंत काम पूर्ण होईल.* सुपर कम्युनिकेशन हाय-वेसाठी ३0 हजार हेक्टर जमीन लागणार.* हाय-वेवर २६ जिल्हे जोडले जाणार असून, २२ ठिकाणी इंटरचेंज पॉइंट राहणार