शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:42 IST

अकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 

ठळक मुद्देआ. बाजोरिया यांच्या प्रश्नावर ना. फुंडकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये खारपाणपट्टय़ाचा भाग समाविष्ट होतो. खारपाणपट्टय़ातील ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या भागात नेमक्या कोणत्या विकास कामांचा समावेश असून, प्रकल्पांचे कामकाज कधी पूर्ण होईल, असा सवाल विधिमंडळात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. रखडलेल्या प्रकल्पांची शासन स्तरावरून चौकशी झाली का, असा प्रश्न उपस्थित करून आ. बाजोरिया यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांचा निर्णय जुलै २0१६ मध्ये घेण्यात आला होता. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 

पुलांच्या कामाला विलंब का?

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून चौपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली असून, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे हा परिणाम झाला का, असा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
  • अमरावती ते अकोला ते बाळापूर-खामगाव ते चिखलीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण होत असले तरी महामार्गावर आवश्यक ठिकाणी असणार्‍या पुलांचे काम अद्यापही सुरू झाले नाही. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असतानाच पुलांचे कामही सुरू होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
  • त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २0१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तसेच पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले. 
टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाAkola Ruralअकोला ग्रामीण