शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या संकटात भर!

By admin | Updated: July 17, 2017 03:35 IST

दमदार पावसाची प्रतीक्षा; वाचलेल्या पिकांची वाढ मर्यादित

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग दहा वर्षांपासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही.यावर्षी पुन्हा पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला असून, शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी त्यांना बँका, सावकारांचे दरवाजे ठोठावे लागले.पण त्यांच्या या प्रयत्नांना यातील कोणीच दाद देत नसल्याचे चित्र आहे.यातच पावसाचा थांगपत्ताच नसल्याने पेरण्या उलटल्या आहेत. दुबार, तिबार पेरणीसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे; आता तर अर्थबळच उरले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतं पेरण्याऐवजी कोरडे ठेवले आहे.मागील वर्षी अल्पशी सुधारणा वगळता विदर्भातील कृषी विकासाचा दर गत बारा वर्षांपासून शून्य टक्क्यावरच आहे. पुन्हा नैसर्गिक आपत्ती, भूमी आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकास दरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. गत पाच वर्षांत तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील पावसाचे प्रमाण हे असमान असल्याने गेल्या दहा वर्षांतील शेतीपासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यावर्षी तर बिकट परिस्थिती असून, मुग,उडिदाचे पीक संपले आहे. सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन या परिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात घटण्याची शक्यता आहे.या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वांमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याचवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणने आहे. पण सर्वच बाजुने परिस्थिती प्रतिकुल असल्याने यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पावसाअभावी पेरण्या केल्या नाहीत त्यांनी शेत कोरडी ठेवली असून, पाऊस आलाच तर हरभरा पेरणीचा विचार करणार असल्याचे एकूणच ग्रामीण भागात सद्याचे चित्र आहे.दरम्यान, गत दोन, तीन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील काही भागात तुरळक स्वरू पाचा पाऊस झाल्याने तिबार पेरणीपासून वाचलेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. ती पीक तग धरू न असली तरी जमिनीत ओलावाच नाही,सद्या ढगाळ वातावरण आहे. त्याचा फायदा या पिकांना होत आहे.विदर्भात तुरळक पाऊस विदर्भात पावसाचे तुरळक पुनरागमन झाले आहे.पण पडणारा पाऊस विशिष्ट भागातच होत आहे. सार्वत्रिक, दमदार पाऊस अद्याप झाला नसून, धरणांचा जलसाठादेखील शेवटच्या घटका मोजत आहे. पश्चिम विदर्भासाठी पीक, पाण्याच्या बाबतीत ही संकटाची सूचना असल्याने सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.