शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या संकटात भर!

By admin | Updated: July 17, 2017 03:35 IST

दमदार पावसाची प्रतीक्षा; वाचलेल्या पिकांची वाढ मर्यादित

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग दहा वर्षांपासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही.यावर्षी पुन्हा पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला असून, शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी त्यांना बँका, सावकारांचे दरवाजे ठोठावे लागले.पण त्यांच्या या प्रयत्नांना यातील कोणीच दाद देत नसल्याचे चित्र आहे.यातच पावसाचा थांगपत्ताच नसल्याने पेरण्या उलटल्या आहेत. दुबार, तिबार पेरणीसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे; आता तर अर्थबळच उरले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतं पेरण्याऐवजी कोरडे ठेवले आहे.मागील वर्षी अल्पशी सुधारणा वगळता विदर्भातील कृषी विकासाचा दर गत बारा वर्षांपासून शून्य टक्क्यावरच आहे. पुन्हा नैसर्गिक आपत्ती, भूमी आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकास दरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. गत पाच वर्षांत तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील पावसाचे प्रमाण हे असमान असल्याने गेल्या दहा वर्षांतील शेतीपासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यावर्षी तर बिकट परिस्थिती असून, मुग,उडिदाचे पीक संपले आहे. सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन या परिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात घटण्याची शक्यता आहे.या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वांमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याचवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणने आहे. पण सर्वच बाजुने परिस्थिती प्रतिकुल असल्याने यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पावसाअभावी पेरण्या केल्या नाहीत त्यांनी शेत कोरडी ठेवली असून, पाऊस आलाच तर हरभरा पेरणीचा विचार करणार असल्याचे एकूणच ग्रामीण भागात सद्याचे चित्र आहे.दरम्यान, गत दोन, तीन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील काही भागात तुरळक स्वरू पाचा पाऊस झाल्याने तिबार पेरणीपासून वाचलेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. ती पीक तग धरू न असली तरी जमिनीत ओलावाच नाही,सद्या ढगाळ वातावरण आहे. त्याचा फायदा या पिकांना होत आहे.विदर्भात तुरळक पाऊस विदर्भात पावसाचे तुरळक पुनरागमन झाले आहे.पण पडणारा पाऊस विशिष्ट भागातच होत आहे. सार्वत्रिक, दमदार पाऊस अद्याप झाला नसून, धरणांचा जलसाठादेखील शेवटच्या घटका मोजत आहे. पश्चिम विदर्भासाठी पीक, पाण्याच्या बाबतीत ही संकटाची सूचना असल्याने सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.