शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात

By atul.jaiswal | Updated: November 18, 2017 17:40 IST

अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी सत्यपाल महाराज राज्यभरातील गुरुदेव भक्तांची राहणार मांदीयाळी

अकोला : विश्वात्मक विचारांची, राष्ट्रीयत्वाची पेरणी करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समृद्ध विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांपूर्वी सुरु झालेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी सप्तखंजेरीवादक ज्येष्ठ गुरुदेव प्र्नचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा अंधारे असणार आहेत, अशी माहिती वंदनिय राष्ट्रसंती श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ग्रामगीता प्रचारक गोवर्धन खवले यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान चिंतनाने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता डॉ. पंदेकृविचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनासला प्रमुख अतिथी म्हणून आचार्य हरीभाऊ वेरुळकर, ज्येष्ठ किर्तनकार आमले महाराज, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, गुरुकुंज प्रचारप्रमुख दामोदर पाटील, आजीवन प्रचारक भास्करराव विघे, भाजप महासचिव रामदास आंबटकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, काँग्रेस शहराध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले, संतोष हुशे आदी उपस्थित राहणार आहेत.यानंतर दुपारी २ वाजता ‘आम्ही घडू देशासाठी’ हा परिसंवाद अमरावी विद्यापीठ रासेयो संचालक प्रा. डॉ. राजेश मिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी ४ वा. स्व. अंबरिश कविश्वर स्मृती निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ, सायंकाळी ५.३० वाजता ‘आजच्या युवकांची दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान, तर रात्री ८ वाजता अ‍ॅड. अनंत खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर ११.३० वाजताा अ‍ॅड. विनोद साकरकार यांच्या अध्यक्षतेखाली शेतीविषयक धोरण विषयावर परिसंवाद, त्यानंतर दुपारी १.३० वा. ‘राष्ट्रसंतांना अपेक्षीत महिलोन्नती’ हा परिसंवाद, दुपारी २.३० वा. ‘ग्रामगीता जीवन विकास परिक्षा काळाची गरज’हा परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ४.३० वा. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत समारोपीय सत्राला प्रारंभ होईल. रात्री. ८ वा. संदीपपाल महाराज यांच्या राष्ट्रीय प्रबोधनाने संमेलनाची सांगता होईल. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज