शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या कामांसाठी अधिकारी जाणार शेतावर !

By admin | Updated: August 27, 2015 23:56 IST

अपूर्ण कामे पूर्ण करणार; शेतक-यांच्या अडचणींचा निपटारा करणार असल्याचे जिल्हाधिका-यांची स्पष्टोक्ती.

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आता जिल्हाधिकार्‍यांसह प्रमुख अधिकारी शेतावर जाऊन विहिरींच्या कामांची पाहणी करणार आहेत. अधिकारी शेतकर्‍यांसोबत चर्चा करून, कामातील अडचणींचा निपटारा करीत सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयोग राबविला जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात; मात्र कामे सुरू झाल्यानंतर विविध कारणांमुळे ही कामे रखडली जातात. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकार्‍यांसह सर्व प्रमुख अधिकारी शेतात जाऊन सिंचन विहिरींच्या कामांची पाहणी करण्याचा प्रयोग अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी भेट देतील, कामांची पाहणी करतील. लाभार्थी शेतकर्‍यांसोबत अधिकारी चर्चा करतील आणि विहिरींची कामे अपूर्ण असल्याची कारणे समजून घेणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणी व समस्यांचा निपटारा अधिकार्‍यांकडून करण्यात येणार आहे. अकोला जिल्हाधिकार्‍यांच्या या प्रयोगाच्या संकल्पनेची दखल रोहयो सचिव व्ही. गिरीराज यांनी घेतली असून, असाच प्रयोग अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम व वर्धा या जिल्ह्यातही राबविण्याचे त्यांनी सुचविले आहे.

जिल्हाधिकारी, सीईओ आजपासून करणार विहिरींची पाहणी!

    अकोला जिल्ह्यात नरेगा अंतर्गत अपूर्ण सिंचन विहिरींच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह शुक्रवार, २८ ऑगस्टपासून पाहणी करतील. लाभार्थी शेतकर्‍यांसोबत चर्चा करून, सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांची कारणे जाणून घेतील, तसेच कामे पूर्ण करण्यासाठी अडचणींचा निपटारा करण्यात येणार आहे.

तालुका स्तरावर शेतक-यांच्या मुलाखती!

सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असल्याची कारणे, अडचणी व त्यासंदर्भात लाभार्थी शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन, आवश्यक त्या उपाययोजना करून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर संबंधित अधिकारी लाभार्थी शेतकर्‍यांच्या मुलाखती घेणार आहेत.