शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

खारपाणपट्ट्यात सुपीक माती वाहून जाण्याचे प्रमाण हेक्टरी २६ टनावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:39 IST

अकोला : शेतीची बांधबदिस्ती, तंत्रज्ञान न वापरल्याने विदर्भाच्या खारपाणपट्ट्यातील हेक्टरी २६ टनाच्यावर सुपीक माती दरवर्षी पावसासोबत वाहून जात आहे.

ठळक मुद्देया मातीसोबतच शेतातील अन्नद्रव्य वाहून जात असल्याने जमिनीची पोत घसरत आहे. त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होत असल्याचा निष्कर्ष अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढला आहे. उपाययोजना पावसापूर्वीच करणे गरजेचे असल्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : शेतीची बांधबदिस्ती, तंत्रज्ञान न वापरल्याने विदर्भाच्या खारपाणपट्ट्यातील हेक्टरी २६ टनाच्यावर सुपीक माती दरवर्षी पावसासोबत वाहून जात आहे. या मातीसोबतच शेतातील अन्नद्रव्य वाहून जात असल्याने जमिनीची पोत घसरत असून, त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होत असल्याचा निष्कर्ष अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढला आहे. तसेच शासनातर्फे सध्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. पण, शेततळ््यात माती जाणार नाही, याचीही उपाययोजना पावसापूर्वीच करणे गरजेचे असल्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.पश्चिम विदर्भात खारपाणपट्टा असून, भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर या भागातील शेतकºयांची भिस्त असल्याने शेतकरी दरवर्षी चातकासारखे पावसाच्या प्रतीक्षेत असतात. यावर्षी मुबलक पावसाचे भाकीत वर्तविण्यात आल्याने शेतकºयांचे डोळे आतापासूनच नभाकडे लागले आहेत. शेतात पाणी साचवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत शेतकºयांनी गोडे पाणी साचवून ठेवण्यासाठी शेततळे बांधली आहेत. पण, या शेततळ््यात माती जाणार नाही ही काळजी घ्यावी लागणार आहे. शेततळ््याचे आयुष्य चार वर्षांचे आहे. हे आयुष्य वाढवायचे असेल, तर शेतकºयांना पावसासोबत माती शेततळ््यात वाहून जाणार नाही, याची उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी फांदेरी सांडवा तयार करणे गरजेचे आहे.शेतातील सुपीक माती वाहून जाऊ नये, यासाठी पावसापूर्वी शेतात वाफे तयार करणे महत्त्वाचे आहे. उताराला आडवे समतल चर, उताराला आडवी पेरणी, सफाट शेतावर वाफे तयार करावे, कंटुर शेती, पेरणीनंतर ३० दिवसांनी सरी, ओरंबे काढणे गरजेचे आहे. या उपाययोजना केल्यास पावसासोबत माती वाहून जाण्याचे प्रमाण मात्र कमी करता येते. ज्या शेतकºयांनी या तंत्रज्ञानाचा वापर शेतात केला, त्यांच्या शेतातील माती वाहून जाण्याचे प्रमाण हे हेक्टरी ११ टनाने कमी झाले. 

मातीतील ‘एनपीके’ घटतोय !या सुपीक मातीसोबतच अन्नधान्य निर्मितीसाठी लागणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य मातीसोबत वाहून गेल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. यामध्ये नत्राचे हेक्टरी प्रमाण हे नऊ किलो असून, स्फुरद ८.९ किलो एवढे आहे, तर पालाश हेक्टरी ९.५ (एनपीके) किलो या प्रमाणात पावसासोबत वाहून जाण्याचे प्रमाण आहे. 

शेततळ््यासह शेतातील सुपीक माती पावसासोबत वाहून जाऊ नये, यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या असून, शिफारसही केली आहे. शासनाने या शिफ ारशींना मान्यता दिली आहे.- डॉ. सुभाष टाले, विभाग प्रमुख, जल व मृद संधारण, डॉ. पंदेकृवि, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ