शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

खारपाणपट्ट्यात सुपीक माती वाहून जाण्याचे प्रमाण हेक्टरी २६ टनावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:39 IST

अकोला : शेतीची बांधबदिस्ती, तंत्रज्ञान न वापरल्याने विदर्भाच्या खारपाणपट्ट्यातील हेक्टरी २६ टनाच्यावर सुपीक माती दरवर्षी पावसासोबत वाहून जात आहे.

ठळक मुद्देया मातीसोबतच शेतातील अन्नद्रव्य वाहून जात असल्याने जमिनीची पोत घसरत आहे. त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होत असल्याचा निष्कर्ष अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढला आहे. उपाययोजना पावसापूर्वीच करणे गरजेचे असल्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : शेतीची बांधबदिस्ती, तंत्रज्ञान न वापरल्याने विदर्भाच्या खारपाणपट्ट्यातील हेक्टरी २६ टनाच्यावर सुपीक माती दरवर्षी पावसासोबत वाहून जात आहे. या मातीसोबतच शेतातील अन्नद्रव्य वाहून जात असल्याने जमिनीची पोत घसरत असून, त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होत असल्याचा निष्कर्ष अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढला आहे. तसेच शासनातर्फे सध्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. पण, शेततळ््यात माती जाणार नाही, याचीही उपाययोजना पावसापूर्वीच करणे गरजेचे असल्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.पश्चिम विदर्भात खारपाणपट्टा असून, भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर या भागातील शेतकºयांची भिस्त असल्याने शेतकरी दरवर्षी चातकासारखे पावसाच्या प्रतीक्षेत असतात. यावर्षी मुबलक पावसाचे भाकीत वर्तविण्यात आल्याने शेतकºयांचे डोळे आतापासूनच नभाकडे लागले आहेत. शेतात पाणी साचवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत शेतकºयांनी गोडे पाणी साचवून ठेवण्यासाठी शेततळे बांधली आहेत. पण, या शेततळ््यात माती जाणार नाही ही काळजी घ्यावी लागणार आहे. शेततळ््याचे आयुष्य चार वर्षांचे आहे. हे आयुष्य वाढवायचे असेल, तर शेतकºयांना पावसासोबत माती शेततळ््यात वाहून जाणार नाही, याची उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी फांदेरी सांडवा तयार करणे गरजेचे आहे.शेतातील सुपीक माती वाहून जाऊ नये, यासाठी पावसापूर्वी शेतात वाफे तयार करणे महत्त्वाचे आहे. उताराला आडवे समतल चर, उताराला आडवी पेरणी, सफाट शेतावर वाफे तयार करावे, कंटुर शेती, पेरणीनंतर ३० दिवसांनी सरी, ओरंबे काढणे गरजेचे आहे. या उपाययोजना केल्यास पावसासोबत माती वाहून जाण्याचे प्रमाण मात्र कमी करता येते. ज्या शेतकºयांनी या तंत्रज्ञानाचा वापर शेतात केला, त्यांच्या शेतातील माती वाहून जाण्याचे प्रमाण हे हेक्टरी ११ टनाने कमी झाले. 

मातीतील ‘एनपीके’ घटतोय !या सुपीक मातीसोबतच अन्नधान्य निर्मितीसाठी लागणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य मातीसोबत वाहून गेल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. यामध्ये नत्राचे हेक्टरी प्रमाण हे नऊ किलो असून, स्फुरद ८.९ किलो एवढे आहे, तर पालाश हेक्टरी ९.५ (एनपीके) किलो या प्रमाणात पावसासोबत वाहून जाण्याचे प्रमाण आहे. 

शेततळ््यासह शेतातील सुपीक माती पावसासोबत वाहून जाऊ नये, यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या असून, शिफारसही केली आहे. शासनाने या शिफ ारशींना मान्यता दिली आहे.- डॉ. सुभाष टाले, विभाग प्रमुख, जल व मृद संधारण, डॉ. पंदेकृवि, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ