शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे पीकही हातचे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 10:53 IST

Cotton Crop, Akola News बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून उडीद, मूग पिकाबरोबर सोयाबीनचे पीकही गेले. आता कपाशीबाबतही तीच स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. आधी कपाशीची पानगळ झाली, नंतर अतिवृष्टीमुळे बोंडे सडली आणि आता कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. वारंवार कीटकनाशक फवारूनही बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. तसेच बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिरायती, बागायती व फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची झळ बसली आहे. शासनाकडून अद्यापही नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. गेल्या चार महिन्यात सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ५१,८५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन हे पीक धुऊन नेले. त्यापाठोपाठ आता कपाशीचे पीकही धोका देण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधी पानगळ झाली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे कपाशीची बोंडे सडली. आता या कपाशीवर बोंडअळ्यांनी हल्ला केला आहे. या कच्च्या असलेल्या बोंडातच किती तरी अळ्या दिसून येत आहेत. कपाशीचे पीकही हातचे गेल्यास शेतकरी आणखी आर्थिक गर्तेत लोटला जाणार आहे. शासनाने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे.

तुरीचे पीकही धोक्यात

पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीकही धोक्यात सापडले आहे. सध्या शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी