शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे पीकही हातचे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 10:53 IST

Cotton Crop, Akola News बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून उडीद, मूग पिकाबरोबर सोयाबीनचे पीकही गेले. आता कपाशीबाबतही तीच स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. आधी कपाशीची पानगळ झाली, नंतर अतिवृष्टीमुळे बोंडे सडली आणि आता कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. वारंवार कीटकनाशक फवारूनही बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. तसेच बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिरायती, बागायती व फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची झळ बसली आहे. शासनाकडून अद्यापही नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. गेल्या चार महिन्यात सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ५१,८५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन हे पीक धुऊन नेले. त्यापाठोपाठ आता कपाशीचे पीकही धोका देण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधी पानगळ झाली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे कपाशीची बोंडे सडली. आता या कपाशीवर बोंडअळ्यांनी हल्ला केला आहे. या कच्च्या असलेल्या बोंडातच किती तरी अळ्या दिसून येत आहेत. कपाशीचे पीकही हातचे गेल्यास शेतकरी आणखी आर्थिक गर्तेत लोटला जाणार आहे. शासनाने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे.

तुरीचे पीकही धोक्यात

पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीकही धोक्यात सापडले आहे. सध्या शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी