शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे पीकही हातचे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 10:53 IST

Cotton Crop, Akola News बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून उडीद, मूग पिकाबरोबर सोयाबीनचे पीकही गेले. आता कपाशीबाबतही तीच स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. आधी कपाशीची पानगळ झाली, नंतर अतिवृष्टीमुळे बोंडे सडली आणि आता कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. वारंवार कीटकनाशक फवारूनही बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. तसेच बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिरायती, बागायती व फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची झळ बसली आहे. शासनाकडून अद्यापही नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. गेल्या चार महिन्यात सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ५१,८५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन हे पीक धुऊन नेले. त्यापाठोपाठ आता कपाशीचे पीकही धोका देण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधी पानगळ झाली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे कपाशीची बोंडे सडली. आता या कपाशीवर बोंडअळ्यांनी हल्ला केला आहे. या कच्च्या असलेल्या बोंडातच किती तरी अळ्या दिसून येत आहेत. कपाशीचे पीकही हातचे गेल्यास शेतकरी आणखी आर्थिक गर्तेत लोटला जाणार आहे. शासनाने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे.

तुरीचे पीकही धोक्यात

पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीकही धोक्यात सापडले आहे. सध्या शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी