शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भय इथले संपत नाही; दहा वर्षांत ३१ जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST

संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यातील चतारी येथे किडनी आजाराचे थैमान सुरूच असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे गत ...

संतोषकुमार गवई

पातूर : तालुक्यातील चतारी येथे किडनी आजाराचे थैमान सुरूच असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे गत दहा वर्षांत जवळपास ३१ जणांचा मृत्यू किडनीच्या आजाराने झाला असून, सद्यस्थितीत १००च्यावर रुग्णांवर उपाचार सुरू असल्याचे चित्र आहे.

किडनी आजाराचे गावाला ग्रहण लागले असून, दरवर्षी चार ते पाच जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू होत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून, प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे. सन २००९-१० या वर्षापासून चतारी येथे किडनी आजाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. गावात पाण्याची पातळी घटल्याने पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण वाढले. नागरिकांना दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्याने क्षारयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. यामुळेच गावात किडनी आजाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------

मृत्यूमध्ये युवकांची संख्या अधिक

चतारी येथे किडनीच्या आजाराने गत दहा वर्षात ३१ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये सर्वाधिक संख्या युवकांची आहे. गेल्या दहा वर्षापूर्वी किडनीच्या आजाराने मृत्यू होण्याचे सुरू झालेले सत्र अद्यापही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. गावाचे भविष्यच धोक्यात असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

----------------------------------------

आरओ प्लांट ठरतोय कुचकामी

गावात खासदार निधीतून ‘आरओ प्लांट’ उभारण्यात आला; मात्र यासाठी अपुरे पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना क्षारयुक्त पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. यामुळे गावात किडनीच्या आजाराचा धोका बळावला आहे.

---------------------

ग्रामीण रुग्णालयही आजारी!

चतारी येथे ग्रामीण रुग्णालय असून आजारी असल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत शिकस्त झाली असून, रुग्णालयामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.