शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

झुडपांमुळे अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST

--------- वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान अडगाव : यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणी आटोपत आली असून, ...

---------

वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान

अडगाव : यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणी आटोपत आली असून, आता रब्बी पीक बहरत असताना वन्य प्राण्यांनी हैदोस घालत या पिकांची नासाडी सुरू केल्याने ही पिके संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.

वीज पुरवठा खंडित; नागरिक त्रस्त!

बार्शीटाकळी: तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच कृषी पंपांचाही वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.

रोजगार देण्याची मागणी

चोहोट्टा बाजार: परिसरातील गावात शेकडो कामगार परत आले आहेत; मात्र परिसरात शेतीशिवाय कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवकांकडून करण्यात आली आहे.

पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

पिंजर: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे अनेक भागात पथदिवे बंद आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात रात्रीच्या वेळी अंधारात ग्रामस्थांना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

पीक कर्जाची प्रतीक्षा कायम

पारस : येथील शेकडो शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळूनही आधार प्रमाणिकरणाअभावी यंदाच्या हंगामात पीक कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. २३ नोव्हेंबरपर्यंतही अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेच नाही.

देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था

वाडेगाव: देगाव ते वाडेगाव या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे असून, खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा मागणी करीत ग्रामस्थ करीत आहेत.

रब्बीची कामे अंतिम टप्प्यात

माना : मूर्तिजापूर तालुक्यातील माना, कुरूम परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, पेरणी झालेल्या शेतामध्ये पिके जोमाने अंकुरली असल्याने शेतकरी वर्ग समाधानी दिसत आहे. परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढणार असून, त्यात गहू, हरभऱ्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

आपातापा: येथील अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन तूर, कपासी, या पिकांसाठी पीक विमा काढला; परंतु नुकसानग्रस्त शेतक-यांना केवळ सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठीच विमा मंजूर केला असून, कारपा येथील नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना विमाभरपाईची प्रतीक्षा कायमच आहे.