शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे ...

बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे. तसेच तुरीच्या पिकाला शेंंगा लागलेल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारणीची लगबग शेतशिवारात दिसून येत आहे.

सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांची मोठी हानी झाली. लावलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तुरीचे पीक चांगले येईल, अशी आशा बाळगून असताना तालुक्यातील ग्रामीण भागात तूर पिकावर अळीने थैमान घातले आहे. तूर पीक वाचविण्यासाठी शेतशिवारात फवारणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील टाकळी खुरेशी, माणकी, खिरपुरी, व्याळा, देगाव, बोरगाव वैराळे, अंदुरा, निमकर्दा, शिंगोली, दुधाळा, लोणाग्रा, मालवाडा, मंडाळा, टाकळी खोजबळ या परिसरात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे; मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलोऱ्याची गळती होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे.

रब्बी हंगामात यंदा हरभऱ्याची पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक अंकुरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिसरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

------------------------------

यंदा खरीप हंगामात लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

- प्रमोद सिरसाट, शेतकरी, मानकी