शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे ...

बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे. तसेच तुरीच्या पिकाला शेंंगा लागलेल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारणीची लगबग शेतशिवारात दिसून येत आहे.

सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांची मोठी हानी झाली. लावलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तुरीचे पीक चांगले येईल, अशी आशा बाळगून असताना तालुक्यातील ग्रामीण भागात तूर पिकावर अळीने थैमान घातले आहे. तूर पीक वाचविण्यासाठी शेतशिवारात फवारणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील टाकळी खुरेशी, माणकी, खिरपुरी, व्याळा, देगाव, बोरगाव वैराळे, अंदुरा, निमकर्दा, शिंगोली, दुधाळा, लोणाग्रा, मालवाडा, मंडाळा, टाकळी खोजबळ या परिसरात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे; मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलोऱ्याची गळती होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे.

रब्बी हंगामात यंदा हरभऱ्याची पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक अंकुरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिसरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

------------------------------

यंदा खरीप हंगामात लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

- प्रमोद सिरसाट, शेतकरी, मानकी