शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही  - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:53 IST

अकोला : शेतकर्‍यांची हजारो क्विंटल तूर विकल्या गेली नाही. पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी दिली, त्यात अनेक जाचक अटी लादल्या. कापूस उत्पादक शेतकर्‍याला एकरी २0 हजार रुपये खर्च येतो. शेतमालाला भाव मिळत नाही. भारत कृषिप्रधान देश असूनही सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. शेतकर्‍यांसंदर्भात मी खोटे बोलत असेल, तर सरकारला माझे खुले आव्हान आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असा आरोप करीत शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात घेतली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संवाद सभा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांची हजारो क्विंटल तूर विकल्या गेली नाही. पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी दिली, त्यात अनेक जाचक अटी लादल्या. कापूस उत्पादक शेतकर्‍याला एकरी २0 हजार रुपये खर्च येतो. शेतमालाला भाव मिळत नाही. भारत कृषिप्रधान देश असूनही सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. शेतकर्‍यांसंदर्भात मी खोटे बोलत असेल, तर सरकारला माझे खुले आव्हान आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असा आरोप करीत शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात घेतली आहे.शेतकरी जागर मंचातर्फे रविवारी दुपारी खंडेलवाल भवनात आयोजित शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते. मंचावर शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, महादेवराव भुईभार, डॉ. हर्षवर्धन मालोकार, ज्ञानेश्‍वर सुलताने, मनोज तायडे, शेतकरी संघटनेचे अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प. माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, शेकापचे प्रदीप देशमुख, काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसैन, ज्ञानेश्‍वर गावंडे, नंदकिशोर टेके, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, टिना देशमुख, सय्यद बाशिद, अन्सार शेख आदी उपस्थित होते. खा. पटोले बोलताना म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या कोणत्याही समस्या सोडविल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकरी, जनतेच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेसुद्धा शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. शेतकरी आणि शेतीचा विकास करायचा असेल, तर केंद्र शासनाने शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला हवा, इंग्लंडसारख्या देशाची ८५ टक्के भागीदारी शेतीत आहे. हे धोरण केंद्राने स्वीकारायला हवे, शेतमालाचे सर्मथनमूल्य वाढवावे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीच्या अर्जात लादलेल्या जाचक अटी मागे घेऊन शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्‍यांनी जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन खा. पटोले यांनी केले. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्याची दखल शासन घेत नाही, त्यामुळे आता सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही खा. पटोले यांनी स्पष्ट केले.  कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.

जातीय राजकारणातून बाहेर पडून एकजूट व्हा!राज्यात अकोला जिल्हा जातीय राजकारणासाठी ओळखल्या जातो. जातीय मतांचे अकोल्यात मोठे प्राबल्य आहे. आता शेतकरी समस्यांच्या मुद्यांवर ते बाजूला सारा, जातीव्यवस्थेच्या राजकारणातून बाहेर पडा, एकजूट व्हा. जात, धर्माला महत्त्व न देता खरा लोकांचा प्रतिनिधी तयार करा, असे आवाहनही खासदार नाना पटोले यांनी शेतकरी संवाद सभेत केले. 

राज्य व केंद्रातील कृषी मंत्री नावालाच!शेतकर्‍यांसमोर समस्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. निसर्ग साथ देत नाही. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांनी सक्रिय असायला हवे. शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला हवा; परंतु राज्य व केंद्रातील दोन्हीही कृषी मंत्री केवळ नावालाच आहेत, असा आरोपही खा. पटोले यांनी केला.