शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही  - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:53 IST

अकोला : शेतकर्‍यांची हजारो क्विंटल तूर विकल्या गेली नाही. पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी दिली, त्यात अनेक जाचक अटी लादल्या. कापूस उत्पादक शेतकर्‍याला एकरी २0 हजार रुपये खर्च येतो. शेतमालाला भाव मिळत नाही. भारत कृषिप्रधान देश असूनही सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. शेतकर्‍यांसंदर्भात मी खोटे बोलत असेल, तर सरकारला माझे खुले आव्हान आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असा आरोप करीत शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात घेतली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संवाद सभा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांची हजारो क्विंटल तूर विकल्या गेली नाही. पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी दिली, त्यात अनेक जाचक अटी लादल्या. कापूस उत्पादक शेतकर्‍याला एकरी २0 हजार रुपये खर्च येतो. शेतमालाला भाव मिळत नाही. भारत कृषिप्रधान देश असूनही सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. शेतकर्‍यांसंदर्भात मी खोटे बोलत असेल, तर सरकारला माझे खुले आव्हान आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असा आरोप करीत शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात घेतली आहे.शेतकरी जागर मंचातर्फे रविवारी दुपारी खंडेलवाल भवनात आयोजित शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते. मंचावर शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, महादेवराव भुईभार, डॉ. हर्षवर्धन मालोकार, ज्ञानेश्‍वर सुलताने, मनोज तायडे, शेतकरी संघटनेचे अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प. माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, शेकापचे प्रदीप देशमुख, काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसैन, ज्ञानेश्‍वर गावंडे, नंदकिशोर टेके, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, टिना देशमुख, सय्यद बाशिद, अन्सार शेख आदी उपस्थित होते. खा. पटोले बोलताना म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या कोणत्याही समस्या सोडविल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकरी, जनतेच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेसुद्धा शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. शेतकरी आणि शेतीचा विकास करायचा असेल, तर केंद्र शासनाने शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला हवा, इंग्लंडसारख्या देशाची ८५ टक्के भागीदारी शेतीत आहे. हे धोरण केंद्राने स्वीकारायला हवे, शेतमालाचे सर्मथनमूल्य वाढवावे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीच्या अर्जात लादलेल्या जाचक अटी मागे घेऊन शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्‍यांनी जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन खा. पटोले यांनी केले. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्याची दखल शासन घेत नाही, त्यामुळे आता सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही खा. पटोले यांनी स्पष्ट केले.  कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.

जातीय राजकारणातून बाहेर पडून एकजूट व्हा!राज्यात अकोला जिल्हा जातीय राजकारणासाठी ओळखल्या जातो. जातीय मतांचे अकोल्यात मोठे प्राबल्य आहे. आता शेतकरी समस्यांच्या मुद्यांवर ते बाजूला सारा, जातीव्यवस्थेच्या राजकारणातून बाहेर पडा, एकजूट व्हा. जात, धर्माला महत्त्व न देता खरा लोकांचा प्रतिनिधी तयार करा, असे आवाहनही खासदार नाना पटोले यांनी शेतकरी संवाद सभेत केले. 

राज्य व केंद्रातील कृषी मंत्री नावालाच!शेतकर्‍यांसमोर समस्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. निसर्ग साथ देत नाही. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांनी सक्रिय असायला हवे. शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला हवा; परंतु राज्य व केंद्रातील दोन्हीही कृषी मंत्री केवळ नावालाच आहेत, असा आरोपही खा. पटोले यांनी केला.