शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

शेतकरी बचतगट तयार करणार सेंद्रिय खते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:35 IST

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय ...

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर आणि पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यानुषंगाने पीक पद्धतीत सुधारणा करून जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढावा या दृष्टीने शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शेतकरी बचतगटांकडून तयार करण्यात आलेली सेंद्रिय खते शेतीमध्ये वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे.

असे तयार करणार सेंद्रिय खते!

शेतातील काडीकचरा, शेणखत, माती आणि पालापाचोळा कुजवणारे जिवाणू इत्यादी घटकांचा वापर करून शेतकरी बचतगटांकडून सेंद्रिय खते करण्यात येणार आहेत.

जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

शंकर तोटावार

प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.