शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बचतगट तयार करणार सेंद्रिय खते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:35 IST

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय ...

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर आणि पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यानुषंगाने पीक पद्धतीत सुधारणा करून जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढावा या दृष्टीने शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शेतकरी बचतगटांकडून तयार करण्यात आलेली सेंद्रिय खते शेतीमध्ये वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे.

असे तयार करणार सेंद्रिय खते!

शेतातील काडीकचरा, शेणखत, माती आणि पालापाचोळा कुजवणारे जिवाणू इत्यादी घटकांचा वापर करून शेतकरी बचतगटांकडून सेंद्रिय खते करण्यात येणार आहेत.

जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

शंकर तोटावार

प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.