शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

शेतकरी बचतगट तयार करणार सेंद्रिय खते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:35 IST

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय ...

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर आणि पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यानुषंगाने पीक पद्धतीत सुधारणा करून जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढावा या दृष्टीने शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शेतकरी बचतगटांकडून तयार करण्यात आलेली सेंद्रिय खते शेतीमध्ये वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे.

असे तयार करणार सेंद्रिय खते!

शेतातील काडीकचरा, शेणखत, माती आणि पालापाचोळा कुजवणारे जिवाणू इत्यादी घटकांचा वापर करून शेतकरी बचतगटांकडून सेंद्रिय खते करण्यात येणार आहेत.

जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

शंकर तोटावार

प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.