शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

तर...भावांतर योजनेलाही शेतकरी मुकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:57 IST

अकोला: मध्य प्रदेश सरकारने शेतकºयांना हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी केलेल्या भावातील तफावतची रक्कम देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली असून, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शेतकºयांचा सरकार विरोधातील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

- सचिन राऊतअकोला: मध्य प्रदेश सरकारने शेतकºयांना हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी केलेल्या भावातील तफावतची रक्कम देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली असून, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शेतकºयांचा सरकार विरोधातील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक अडते व व्यापाºयांकडेच शेतमालाची विक्री करणे बंधनकारक असून, अडत्यांची पावती (पट्टी) सांभाळून ठेवणे महत्त्वाचे असल्याची माहिती आहे.शेतकºयांचा शेतमाल जसे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीच्या खरेदी-विक्रीचा गावखेड्यातील अनधिकृत व्यापाºयांनी सपाटा लावला आहे. हमीभावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दरामध्ये शेतमालाची गावातील व्यापाºयांनी खरेदी सुरू केली आहे. ज्या शेतकºयांच्या शेतमालाची गावातील अनधिकृत व्यापाºयांनी खरेदी सुरू केली आहे, त्या व्यापाºयांकडे कोणताही परवाना नसल्याने ज्या शेतकºयांनी या गावातील व्यापाºयांना शेतमालाची विक्री केली, तर त्यांना शासनाच्या भावांतर योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे गावातील शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकृत परवाना असलेल्या व्यापाºयांकडेच शेतमालाची विक्री करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव व कमी भावात खरेदी केलेल्या शेतमालातील तफावत असलेल्या दराची रक्कम मिळणार, हे निश्चित आहे. शेतकºयांचा शेतमाल खरेदी करणाºया अनधिकृत व्यापाºयांनी शेतकºयांना विविध आमिष देत तसेच हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी सुरू केली असून, या अनधिकृत व्यापाºयांनी शासनाचा कोट्ट्यवधी रुपयांचा करही बुडविला असल्याने त्यांच्यावर कारवाईचा फास आवळण्याची गरज आहे. 

अशी आहे भावांतर योजना!मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली व महाराष्ट्र सरकार लवकरच सुरू करणार असलेली भावांतर योजना शेतकºयांसाठी लाभदायी आहे. यामध्ये शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व अडत्यांना शेतमाल विक्री केल्यानंतर हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली असेल, तर हमीभाव आणि खरेदी केलेला कमी दर यामध्ये जी फरकाची रक्कम आहे, ती भावांतर योजनेमधून शासन शेतकºयांना देणार आहे. (उदा. ३४०० रुपये हमीभाव आहे; मात्र व्यापाºयांनी तीन हजार रुपये क्विंटलने खरेदी केल्यास फरकाची ४०० रुपये रक्कम शासन देणार आहे.) यासाठी शेतकºयांनी गावखेड्यातील अनधिकृत व्यापाºयांना नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री करणे बंधनकारक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी