शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

तर...भावांतर योजनेलाही शेतकरी मुकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:57 IST

अकोला: मध्य प्रदेश सरकारने शेतकºयांना हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी केलेल्या भावातील तफावतची रक्कम देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली असून, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शेतकºयांचा सरकार विरोधातील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

- सचिन राऊतअकोला: मध्य प्रदेश सरकारने शेतकºयांना हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी केलेल्या भावातील तफावतची रक्कम देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली असून, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शेतकºयांचा सरकार विरोधातील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक अडते व व्यापाºयांकडेच शेतमालाची विक्री करणे बंधनकारक असून, अडत्यांची पावती (पट्टी) सांभाळून ठेवणे महत्त्वाचे असल्याची माहिती आहे.शेतकºयांचा शेतमाल जसे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीच्या खरेदी-विक्रीचा गावखेड्यातील अनधिकृत व्यापाºयांनी सपाटा लावला आहे. हमीभावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दरामध्ये शेतमालाची गावातील व्यापाºयांनी खरेदी सुरू केली आहे. ज्या शेतकºयांच्या शेतमालाची गावातील अनधिकृत व्यापाºयांनी खरेदी सुरू केली आहे, त्या व्यापाºयांकडे कोणताही परवाना नसल्याने ज्या शेतकºयांनी या गावातील व्यापाºयांना शेतमालाची विक्री केली, तर त्यांना शासनाच्या भावांतर योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे गावातील शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकृत परवाना असलेल्या व्यापाºयांकडेच शेतमालाची विक्री करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव व कमी भावात खरेदी केलेल्या शेतमालातील तफावत असलेल्या दराची रक्कम मिळणार, हे निश्चित आहे. शेतकºयांचा शेतमाल खरेदी करणाºया अनधिकृत व्यापाºयांनी शेतकºयांना विविध आमिष देत तसेच हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी सुरू केली असून, या अनधिकृत व्यापाºयांनी शासनाचा कोट्ट्यवधी रुपयांचा करही बुडविला असल्याने त्यांच्यावर कारवाईचा फास आवळण्याची गरज आहे. 

अशी आहे भावांतर योजना!मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली व महाराष्ट्र सरकार लवकरच सुरू करणार असलेली भावांतर योजना शेतकºयांसाठी लाभदायी आहे. यामध्ये शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व अडत्यांना शेतमाल विक्री केल्यानंतर हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली असेल, तर हमीभाव आणि खरेदी केलेला कमी दर यामध्ये जी फरकाची रक्कम आहे, ती भावांतर योजनेमधून शासन शेतकºयांना देणार आहे. (उदा. ३४०० रुपये हमीभाव आहे; मात्र व्यापाºयांनी तीन हजार रुपये क्विंटलने खरेदी केल्यास फरकाची ४०० रुपये रक्कम शासन देणार आहे.) यासाठी शेतकºयांनी गावखेड्यातील अनधिकृत व्यापाºयांना नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री करणे बंधनकारक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी