शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तर...भावांतर योजनेलाही शेतकरी मुकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:57 IST

अकोला: मध्य प्रदेश सरकारने शेतकºयांना हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी केलेल्या भावातील तफावतची रक्कम देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली असून, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शेतकºयांचा सरकार विरोधातील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

- सचिन राऊतअकोला: मध्य प्रदेश सरकारने शेतकºयांना हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी केलेल्या भावातील तफावतची रक्कम देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली असून, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शेतकºयांचा सरकार विरोधातील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक अडते व व्यापाºयांकडेच शेतमालाची विक्री करणे बंधनकारक असून, अडत्यांची पावती (पट्टी) सांभाळून ठेवणे महत्त्वाचे असल्याची माहिती आहे.शेतकºयांचा शेतमाल जसे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीच्या खरेदी-विक्रीचा गावखेड्यातील अनधिकृत व्यापाºयांनी सपाटा लावला आहे. हमीभावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दरामध्ये शेतमालाची गावातील व्यापाºयांनी खरेदी सुरू केली आहे. ज्या शेतकºयांच्या शेतमालाची गावातील अनधिकृत व्यापाºयांनी खरेदी सुरू केली आहे, त्या व्यापाºयांकडे कोणताही परवाना नसल्याने ज्या शेतकºयांनी या गावातील व्यापाºयांना शेतमालाची विक्री केली, तर त्यांना शासनाच्या भावांतर योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे गावातील शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकृत परवाना असलेल्या व्यापाºयांकडेच शेतमालाची विक्री करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव व कमी भावात खरेदी केलेल्या शेतमालातील तफावत असलेल्या दराची रक्कम मिळणार, हे निश्चित आहे. शेतकºयांचा शेतमाल खरेदी करणाºया अनधिकृत व्यापाºयांनी शेतकºयांना विविध आमिष देत तसेच हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी सुरू केली असून, या अनधिकृत व्यापाºयांनी शासनाचा कोट्ट्यवधी रुपयांचा करही बुडविला असल्याने त्यांच्यावर कारवाईचा फास आवळण्याची गरज आहे. 

अशी आहे भावांतर योजना!मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली व महाराष्ट्र सरकार लवकरच सुरू करणार असलेली भावांतर योजना शेतकºयांसाठी लाभदायी आहे. यामध्ये शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व अडत्यांना शेतमाल विक्री केल्यानंतर हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली असेल, तर हमीभाव आणि खरेदी केलेला कमी दर यामध्ये जी फरकाची रक्कम आहे, ती भावांतर योजनेमधून शासन शेतकºयांना देणार आहे. (उदा. ३४०० रुपये हमीभाव आहे; मात्र व्यापाºयांनी तीन हजार रुपये क्विंटलने खरेदी केल्यास फरकाची ४०० रुपये रक्कम शासन देणार आहे.) यासाठी शेतकºयांनी गावखेड्यातील अनधिकृत व्यापाºयांना नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री करणे बंधनकारक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी