शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 14:59 IST

शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला; मात्र शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव समोर येत आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.यासोबतच शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची सवलतही लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. जिल्हाधिकाºयांनी आदेश देण्यास महिनाभराचा कालावधी होत असला तरी, शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याच्या कार्यवाहीचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव आहे.किती शेतकºयांचा; किती शेतसारा माफ?शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा चालू आर्थिक वर्षाचा १३ लाख ९२ हजार रुपयांचा शेतसारा माफ होणार आहे; परंतु शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश गत महिन्यात जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आला आहे; मात्र किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात अहवाल प्राप्त झाले नाहीत. याबाबतचे अहवाल तातडीने तहसीलदारांकडून मागविण्यात येतील.-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी