शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 14:59 IST

शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला; मात्र शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव समोर येत आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.यासोबतच शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची सवलतही लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. जिल्हाधिकाºयांनी आदेश देण्यास महिनाभराचा कालावधी होत असला तरी, शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याच्या कार्यवाहीचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव आहे.किती शेतकºयांचा; किती शेतसारा माफ?शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा चालू आर्थिक वर्षाचा १३ लाख ९२ हजार रुपयांचा शेतसारा माफ होणार आहे; परंतु शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश गत महिन्यात जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आला आहे; मात्र किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात अहवाल प्राप्त झाले नाहीत. याबाबतचे अहवाल तातडीने तहसीलदारांकडून मागविण्यात येतील.-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी