शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 14:59 IST

शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला; मात्र शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव समोर येत आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.यासोबतच शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची सवलतही लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. जिल्हाधिकाºयांनी आदेश देण्यास महिनाभराचा कालावधी होत असला तरी, शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याच्या कार्यवाहीचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव आहे.किती शेतकºयांचा; किती शेतसारा माफ?शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा चालू आर्थिक वर्षाचा १३ लाख ९२ हजार रुपयांचा शेतसारा माफ होणार आहे; परंतु शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश गत महिन्यात जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आला आहे; मात्र किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात अहवाल प्राप्त झाले नाहीत. याबाबतचे अहवाल तातडीने तहसीलदारांकडून मागविण्यात येतील.-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी