शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: April 2, 2016 00:52 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; ६५ हजारांचे होते कर्ज.

साखरखेर्डा (जि. बुलडाणा): येथून जवळच असलेल्या गुंज येथील ३२ वर्षीय युवा शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून शेतातच आत्महत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री घडली. मदन शेषराव तुपकर (३२) यांच्याकडे अडीच एकर शेती असून, शेतीत होणार्‍या उत्पादनावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. गत चार वषार्ंपासून शेतात नापिकीमुळे मदन तुपकर रोजमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. कुठलीही आर्थिक मदत न घेता त्यांनी कुक्कुट पालनाचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता; मात्र २८ मार्चला सैलानी यात्रेत विक्रीसाठी कोंबड्या नेताना उष्माघाताने २00 कोंबड्या मृत पावल्या. यात त्यांचे ३0 हजारांचे नुकसान झाले. स्टेट बँकेचे ३५ हजारांचे कर्ज, ३0 हजारांचे नुकसान आणि शेतीची नापिकी यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. याच विवंचनेत त्याने ३१ मार्च रोजी गुंज शेतशिवारात कीटकनाशक प्राशन केले. मदन यांना तातडीने प्रथम साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले, असता त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना बुलडाणा नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोठय़ा शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.