शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:32 IST

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहे.

- संतोष येलकर

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहेत, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी व शेतमजुरांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शेती, ग्रामीण कृषी उद्योग, घर दुरुस्ती व बचतगटांचे सबळीकरणच्या नावावर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज देण्यात आले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर १८ ते २४ टक्के असून, शेतकरी व शेतमजुरांना परवडणारा नाही; मात्र दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी व शेतमजूर अडकले आहेत. १८ ते २४ टक्के व्याज दराने फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची वसुली करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना धमकावून, कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या या तगाद्याने राज्यातील विविध भागात शेतकरी धास्तावले असून, गाव सोडून जात असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.संघटित सावकारीमुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या!मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या संघटित सावकारीमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर, गत आठवड्यात अकोला जिल्ह्यात फायनान्स कंपनीच्या छळापायी एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.जुलमी वसुली थांबवा; कर्ज वितरणावर बंदी आणा!ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकरी-शेतमजुरांना दिलेल्या कर्जाची वसुली ९ टक्क्यापेक्षा जास्त व्याज दराने करण्यात येऊ नये. तसेच फायनान्स कंपन्यांकडून होणारी जुलमी वसुली सरकाने तातडीने थांबवावी आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकरी व शेतमजुरांना दिलेले कर्ज सरकारने माफ करावे व मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वितरणावर बंदी आणावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी