शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:32 IST

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहे.

- संतोष येलकर

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहेत, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी व शेतमजुरांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शेती, ग्रामीण कृषी उद्योग, घर दुरुस्ती व बचतगटांचे सबळीकरणच्या नावावर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज देण्यात आले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर १८ ते २४ टक्के असून, शेतकरी व शेतमजुरांना परवडणारा नाही; मात्र दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी व शेतमजूर अडकले आहेत. १८ ते २४ टक्के व्याज दराने फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची वसुली करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना धमकावून, कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या या तगाद्याने राज्यातील विविध भागात शेतकरी धास्तावले असून, गाव सोडून जात असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.संघटित सावकारीमुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या!मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या संघटित सावकारीमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर, गत आठवड्यात अकोला जिल्ह्यात फायनान्स कंपनीच्या छळापायी एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.जुलमी वसुली थांबवा; कर्ज वितरणावर बंदी आणा!ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकरी-शेतमजुरांना दिलेल्या कर्जाची वसुली ९ टक्क्यापेक्षा जास्त व्याज दराने करण्यात येऊ नये. तसेच फायनान्स कंपन्यांकडून होणारी जुलमी वसुली सरकाने तातडीने थांबवावी आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकरी व शेतमजुरांना दिलेले कर्ज सरकारने माफ करावे व मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वितरणावर बंदी आणावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी