शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:32 IST

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहे.

- संतोष येलकर

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहेत, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी व शेतमजुरांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शेती, ग्रामीण कृषी उद्योग, घर दुरुस्ती व बचतगटांचे सबळीकरणच्या नावावर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज देण्यात आले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर १८ ते २४ टक्के असून, शेतकरी व शेतमजुरांना परवडणारा नाही; मात्र दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी व शेतमजूर अडकले आहेत. १८ ते २४ टक्के व्याज दराने फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची वसुली करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना धमकावून, कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या या तगाद्याने राज्यातील विविध भागात शेतकरी धास्तावले असून, गाव सोडून जात असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.संघटित सावकारीमुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या!मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या संघटित सावकारीमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर, गत आठवड्यात अकोला जिल्ह्यात फायनान्स कंपनीच्या छळापायी एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.जुलमी वसुली थांबवा; कर्ज वितरणावर बंदी आणा!ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकरी-शेतमजुरांना दिलेल्या कर्जाची वसुली ९ टक्क्यापेक्षा जास्त व्याज दराने करण्यात येऊ नये. तसेच फायनान्स कंपन्यांकडून होणारी जुलमी वसुली सरकाने तातडीने थांबवावी आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकरी व शेतमजुरांना दिलेले कर्ज सरकारने माफ करावे व मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वितरणावर बंदी आणावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी