शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतकऱ्यांनी परत केले तुटपुंज्या विम्याचे चेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

अकाेला : अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून, त्यांना फळ पीकविम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर ...

अकाेला : अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून, त्यांना फळ पीकविम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर झाली आहे. ज्या विम्याचा प्रीमिअम आठ हजार आहे, त्या विम्यापाेटी केवळ हेक्टरी २६५ तर काहींना ५०० रुपये मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. विम्याचा दावा देताना विमा प्रतिनिधीने भेदभाव केला तसेच शेतकऱ्यांशी त्यांची उद्धट वागणूक असल्याची तक्रार घेऊन साेमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी तुटपुंज्या विम्याचे चेक जिल्हाधिकाऱ्यांना परत केले असून, विमा कंपनीच्या विराेधात राेष व्यक्त केला.

अकाेट तालुक्यातील पणज, आकाेलखेड महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक अशाेक वाटिकेपासून केळीचे खांब हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माेर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयात माेर्चा आल्यानंतर पाेलिसांनी माेर्चा अडविल्यामुळे शेतकऱ्यांनी तिथेच ठिय्या मारला. रविकांत तुपकर, सतीश देशमुख आदींसह काही निवडक शेतकऱ्यांसाेबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियाेजन भवनात संवाद साधून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ४५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना तुटपुंजी रक्कम मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. फळ पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील ६००पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. मात्र विमा कंपनीने फसवणूक केली. एकीकडे राज्य सरकार या नुकसानभरपाईपाेटी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत देत असताना विमा कंपनीने शेतकऱ्यांची तुटपुंज्या रकमेवर बाेळवण केली असा आराेप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

बाॅक्स....

विमा प्रतिनिधी निलंबित

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाेबत उद्धट वागणूक करणारा व शेतकऱ्यांना एफआयआरची धमकी देणारा विमा प्रतिनिधी अखेर निलंबित करण्यात आला. सपकाळ असे या प्रतिनिधीचे नाव असून, विम्याचा दावा देताना यांनी प्रचंड भेदभाव केल्याचे शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी उघड केले. या प्रतिनिधींवर कारवाई हाेणार नाही ताेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय साेडणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती. त्याची दखल जिल्हाधिकारी यांना घ्यावीच लागली.

बाॅक्स..

जिल्हाधिकारी कार्यालयातच साेडल्या शिदाेऱ्या

अकाेट तालुक्यातून सकाळीच मिळेल त्या वाहनाने शेतकरी अकाेल्यात दाखल झाले हाेते. पाणी व शिदाेरी असे साहित्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयातच शिदाेऱ्या साेडल्या. जाेपर्यंत न्याय मिळत नाही ताेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय न साेडण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती.

काेट..

शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षात आला आहे. या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचित केले असून, येत्या आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागेल, असा प्रयत्न केला जाईल. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकाेला

काेट...

मस्तवाल विमा प्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या दबावापाेटी पदावरून हटविले आहे. मात्र एवढ्यावर हे आंदाेलन संपले नाही. जाेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळत नाही ताेपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल. प्रसंगी पुन्हा आंदाेलन करू.

रविकांत तुपकर, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना