शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:30 IST

राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे. सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत मात्र शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे डोळेझाक करण्यात येत आहे.निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना भेडसावणाºया विविध समस्या आणि प्रश्नांवर आवाज उठविणे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आता राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, गत दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे कपाशी, सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. पीक नुकसानासह विविध समस्या आणि प्रश्नांचा शेतकºयांना सामना करावा लागत असताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.शेतकºयांच्या अशा आहेत समस्या आणि प्रश्न! पाऊस आणि पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसानाचे सर्व्हे प्रलंबित असून, मदतीचा निर्णय अद्याप झाला नाही. हमी दराने मूग, उडिदाची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने शेतकºयांना कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. बहुतांश शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत. कर्जमाफीसाठी पात्र सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासन निवडणूक तयारीच्या कामात गुंतले आहे. पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांना भेडसावणाºया विविध प्रश्नांकडे कानाडोळा होत आहे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019