शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:30 IST

राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे. सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत मात्र शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे डोळेझाक करण्यात येत आहे.निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना भेडसावणाºया विविध समस्या आणि प्रश्नांवर आवाज उठविणे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आता राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, गत दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे कपाशी, सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. पीक नुकसानासह विविध समस्या आणि प्रश्नांचा शेतकºयांना सामना करावा लागत असताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.शेतकºयांच्या अशा आहेत समस्या आणि प्रश्न! पाऊस आणि पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसानाचे सर्व्हे प्रलंबित असून, मदतीचा निर्णय अद्याप झाला नाही. हमी दराने मूग, उडिदाची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने शेतकºयांना कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. बहुतांश शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत. कर्जमाफीसाठी पात्र सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासन निवडणूक तयारीच्या कामात गुंतले आहे. पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांना भेडसावणाºया विविध प्रश्नांकडे कानाडोळा होत आहे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019