शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:30 IST

राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे. सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत मात्र शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे डोळेझाक करण्यात येत आहे.निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना भेडसावणाºया विविध समस्या आणि प्रश्नांवर आवाज उठविणे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आता राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, गत दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे कपाशी, सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. पीक नुकसानासह विविध समस्या आणि प्रश्नांचा शेतकºयांना सामना करावा लागत असताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.शेतकºयांच्या अशा आहेत समस्या आणि प्रश्न! पाऊस आणि पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसानाचे सर्व्हे प्रलंबित असून, मदतीचा निर्णय अद्याप झाला नाही. हमी दराने मूग, उडिदाची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने शेतकºयांना कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. बहुतांश शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत. कर्जमाफीसाठी पात्र सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासन निवडणूक तयारीच्या कामात गुंतले आहे. पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांना भेडसावणाºया विविध प्रश्नांकडे कानाडोळा होत आहे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019