शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकर्‍यांनी केली रब्बीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:39 IST

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआता परतीच्या पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे. गतवर्षी पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी साडेआठ लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु काढणीच्या वेळी या पावसाने शेतकर्‍यांना दगा दिलाच होता.रब्बी पिकांसाठी ओलाव्याची गरज असते. पण, यावर्षी संपूर्ण पावसाळ्य़ात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. शेतकर्‍यांनी मात्र पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाले, शेततळ्य़ात पाणीच नसल्याने गहू पिकाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 परतीच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत हरभर्‍याची पेरणी शक्यतो टाळावी, हरभर्‍याला कमी पाऊस लागतो, पेरणीनंतर जोरदार पाऊस आल्यास दुबार पेरणीची वेळ येते. ३0 ऑक्टोबरपर्यंत हरभर्‍याची पेरणी करता येईल.डॉ. मोहनराव खाकरे,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Farmerशेतकरी