शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शेतकर्‍यांनी केली रब्बीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:39 IST

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआता परतीच्या पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे. गतवर्षी पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी साडेआठ लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु काढणीच्या वेळी या पावसाने शेतकर्‍यांना दगा दिलाच होता.रब्बी पिकांसाठी ओलाव्याची गरज असते. पण, यावर्षी संपूर्ण पावसाळ्य़ात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. शेतकर्‍यांनी मात्र पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाले, शेततळ्य़ात पाणीच नसल्याने गहू पिकाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 परतीच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत हरभर्‍याची पेरणी शक्यतो टाळावी, हरभर्‍याला कमी पाऊस लागतो, पेरणीनंतर जोरदार पाऊस आल्यास दुबार पेरणीची वेळ येते. ३0 ऑक्टोबरपर्यंत हरभर्‍याची पेरणी करता येईल.डॉ. मोहनराव खाकरे,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Farmerशेतकरी