शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

दुष्काळी अन् अतिवृष्टीची मदतही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:05 IST

अकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ६९ लाख रुपयांची दुष्काळी मदत अद्याप शासनाकडून मिळाली नाही.

- संतोष येलकरअकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ६९ लाख रुपयांची दुष्काळी मदत अद्याप शासनाकडून मिळाली नाही. यासोबतच गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पीक नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत मदत मंजूर करण्यात आली असली तरी, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदतनिधीही मिळाला नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या स्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यानुषंगाने दुष्काळी आणि अतिवृष्टीच्या मदतीचा निधी मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत २३ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी गत फेबु्रवारी अखेरपर्यंत शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली; मात्र दुष्काळी मदतीच्या चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ६९ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे पाचही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी दुष्काळी मदतीच्या चौथ्या टप्प्यातील मदतीच्या लाभापासून वंचित आहेत. तसेच गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पीक नुकसान भरपाईपोटी राज्यातील बाधित शेतकºयांसाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय गत १० जुलै २०१९ रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांच्या मदतीसाठी ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या स्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना गतवर्षीच्या दुष्काळी मदतीच्या चौथ्या टप्प्यातील मदत आणि अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाईची मदतही शेतकºयांना मिळाली नाही. त्यामुळे या मदतीचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मदतीच्या प्रतीक्षेत असे आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी!तालुका शेतकरीअकोला ३०३१तेल्हारा ५६६बाळापूर २७८०पातूर १००बार्शीटाकळी २३४५मूर्तिजापूर ४७२७.........................................एकूण १३५४९दुष्काळी मदतीसाठी ६१.६९ कोटींची मागणी!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ६९ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत महिन्यात शासनाकडे करण्यात आली आहे.अकोट व पातूर तालुक्यात केव्हा मिळणार दुष्काळी मदत?जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांना शासनामार्फत तीन टप्प्यांत वितरित मदतनिधीतून दुष्काळी मदत वाटप करण्यात आली आहे; परंतु गत २१ फेबु्रवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अकोट व पातूर या दोन तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असली तरी, या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शासनामार्फत अद्याप मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे अकोट व पातूर तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदत मिळणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी